अमरावती हिंसाचार प्रकरणात ५७ गुन्हे दाखल, ३१५ आरोपींना अटक!
अमरावती हिंसाचार प्रकरणात ५७ गुन्हे दाखल, ३१५ आरोपींना अटक! अरुण जोशी
महाराष्ट्र

अमरावती हिंसाचार प्रकरणात ५७ गुन्हे दाखल, ३१५ आरोपींना अटक!

अरुण जोशी

अमरावती : अमरावती शहरातील परिस्थिती पाहता सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री ९ पर्यंत शहरातील बाजारपेठ सुरू राहणार असून रात्री ९ पासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. जवळपास १५ तास शहरातील बाजारपेठ सुरू राहणार आहे. अमरावतीत हिंसाचारा दरम्यान झालेल्या नुकसान व लूटमार विरोधात पोलिसांनी आतापर्यंत एकूण ५७ गुन्हे दाखल केले असून ३१५ आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह यांनी आज प्रसार माध्यमांसोबत बोलतांना दिली.

हे देखील पहा :

अमरावती शहरात घडलेल्या हिंसात्मक घटनेवर पोलिसांनी नियंत्रण मिळविल्यानंतर शहरातील संचारबंदीत टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. मंगळवारपासून संचारबंदीत मोठी शिथिलता देण्यात आली आहे. सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत शहरातील सर्व बाजारपेठ सुरू राहणार आहे. रात्री ९ पासून सकाळी ७ वाजेपर्यंत शहरात कडक संचारबंदी राहणार आहे. संबंधित आदेश पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह यांनी निर्गमित केले आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती, फळ व भाजीपाला मार्केट तसेच सक्करसाथ, इतवारा यांना दिलेली सूट ही कायम राहणार आहे.

सध्या अमरावती शहरातील वातावरण सामान्य झाले असून सर्व व्यवहार सुरळीत झाले आहे. हिंसाचारादरम्यान ज्या नागरिकांनी लुटपाट हिंसा घडवणे जाळपोळ करणे अश्या नागरिकांच्या विरोधात पोलिसांनी अटकसत्र सुरु ठेवले असून आजपर्यंत तब्बल ५७ गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत. तर, ३१५ आरोपीना अटक करण्यात आली आहे. सध्या पोलिसांनी शांतता समितीच्या बैठकांचे सत्र शहरातील विविध भागात राबविले असून त्याला दोन्ही समाजातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI Playing XI: आज अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणार? LSG विरुद्ध अशी असेल मुंबईची प्लेइंग ११

Buldhana: ज्वारी खरेदीच्या निकषामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप, नोंदणी कार्यालयात तुडुंब गर्दी

Bribe Case : सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एसीबीच्या ताब्यात; मजुरांचे पैसे काढण्यासाठी मागितली ५ हजारांची लाच

Benifits of Pomogranate Peel: डाळिंबाची साल कचरा समजून फेकून देताय का? जाणून घ्या आरोग्यादायी फायदे

Bhandara News: पिकविम्यात शेतकऱ्यांची थट्टा! नुकसान भरपाई म्हणून मिळाले १०००, १२०० रुपये; बळीराजाचा संताप

SCROLL FOR NEXT