Ganesh Visarjan 2022 Saam Tv
महाराष्ट्र

Yavatmal: गणेश विसर्जनाला गालबोट! दोन मुलांचा नाल्यात बुडून मृत्यू

गणपती पाण्यात नीट बुडाला की नाही हे पाहण्यासाठी पुन्हा पाण्यात गेलेल्या दोन मुलांचा नाल्यात बुडून मृत्यू झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ - राज्यभरात मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक पार पडली. तब्बल दोन वर्षांनंतर पार पडत असलेल्या विसर्जन मिरवणुकीला गणेशभक्तांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. कोरोनाच्या (Corona) 2 वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. गेल्या 10 दिवसांपासून गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्याच यवतमाळच्या (Yavatmal) जिल्ह्यातील आर्णी येथील महागाव येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे.

हे देखील पाहा -

आर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत आणि दिग्रस तालुक्यातील महागाव येथे गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना रात्री दरम्यान घडली आहे. गोकुळ टेटर आणि सोपान गावंडे अशी बुडालेल्या मुलांची नाव आहेत.

शुक्रवारी घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी दोघे जण आपल्या मित्रांसह नाल्यावर गेले होते. गणपती विसर्जन ही करण्यात आले आणि त्यानंतर सर्वे आपापल्या घरी देखील परले. मात्र, गोकुळ आणि सोपान गणपती पाण्यात बुडाला की नाही हे पाहण्यासाठी परत नाल्यावर गेले. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेजण नाल्यात बुडाले. दोघांना तात्काळ बाहेर काढून आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : दिरासोबतच्या प्रेम प्रकरणात पती अडसर, कुख्ख्यात शुटरकडून नवऱ्यावर गोळी चालवली; पुढे जे घडलं ते भयंकर...

Chanakya Niti : या गोष्टींवर पाय लावल्याने आयुष्यभर भोगावी लागतील पापं

Amit Shah : राजकीय निवृत्तीनंतर काय करणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितला प्लान

Virat Kohli : कसोटीतून निवृत्ती का घेतली? विराट कोहलीनं विचित्र कारण सांगितलं, म्हणाला, जेव्हा ४ दिवसांत दाढी...

Maharashtra Live News Update : अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT