Maval Lok Sabha Constituency Saam Tv
लोकसभा २०२४

Maval Lok Sabha: अवकाळी पावसानं मतदानावर फेरलं पाणी; फेरमतदानाची मागणी

Maval Lok Sabha Constituency: हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसाचा मतदानावर परिणाम झाला असून फेरमतदान करण्यात यावे याची मागणी केली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मावळ : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा चौथ्या टप्पा आज पार पडला. राज्यातील ११ ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली मात्र मतदानाच्या टक्केवारीवर अवकाळी पावसानं पाणी फेरल्याचं दिसत आहे. नोंदवण्यात आलेल्या आकडेवारीनुसार संध्याकाळपर्यंत ५२.४९ टक्के मतदान झालंय. अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याने मतदान प्रक्रियेत अडथळा आला. वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे अनेक मतदार मतदान करण्यापासून वंचित राहिलेत. यामुळे येथे फेरमतदान केलं जावं, अशी मागणी केली जातेय.

आज दुपारनंतर अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस कोसळल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे मतदानावर परिणाम झाला. यामुळे कमी मतदान झालेल्या मतदानाच्या ठिकाणी फेरमतदान घेतलं जावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी निवडणूक आयोगाकडे केलीय. बारणे यांनी पत्र लिहून निवडणूक आयोगाकडे ही मागणी केलीय.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा चौथा टप्प्यात मावळ येथे मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र कर्जत परिसरात अवकाळी पावसाने थैमान घातले. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रावरील मतदानावर परिणाम झाला. सकाळपासूनच पावसाचे वातावरण होते. कर्जत, खालापूर, खोपोली भागात पावसाचे वातावरण होते.

उरण, कर्जतमध्ये सकाळपासून मतदानाचा उत्साह होता, मात्र दुपारी कर्जत, खालापूर, खोपोलीत जोरदार पाऊस झाल्याने मतदानाचा वेग मंदावला होता. दरम्यान कर्जत तालुक्यातील अनेक ठिकाणी वादळी वारा आणि पावसामुळे लाईटचे पोल पडले होते त्यामुळे अनेक ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रावर लाईट नसल्याकारणाने मतदार मतदान करू शकले नाहीत.

मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत तालुक्यातील अनेक भागांमध्ये वादळी वारा आणि पाऊस झाल्यामुळे या भागातील लाईटचे पोल पडले होते. तर घरांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रावर लाईट नसल्याकारणाने २ ते ३ तास अनेक नागरीक मतदान करू शकले नाहीत.त्यामुळे कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील परिस्थितीची चौकशी करून त्या भागात फेरमतदान घेण्यात यावे अन्यथा वेळ वाढवून मिळावी अशी विनंती खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी निवडणूक आयोगाकडे केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

SCROLL FOR NEXT