लोकसभा २०२४

Maharashtra Election: संथगतीनं मतदानावरून राजकारण तापलं; मुख्यमंत्री शिंदेंचे चौकशीचे आदेश

Maharashtra Election Voting : मुंबईसह विविध मतदारसंघात 5 व्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेत अनेक मतदान केंद्रांवर मोठा घोळ झाल्याची ओरड झाली होती. मतदानाच्या दिवशी झालेल्या या ढिसाळ कारभाराची सरकारनं गंभीर दखल घेतलीये..मात्र मतदारांना मनस्ताप सहन करावा लागलायं. तर डोंबिवलीत नागरिक थेट कोर्टात जाणारेत...पाहूया.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तन्मय टिल्लू, साम प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात संथगतीनं झालेल्या मतदानावरून राजकारण पेटलंय. तब्बल तासाभरात केवळ आठ-ते दहा मतदार मतदान करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. त्यामुळेच मुंब्रा,पालघर,नाशिक मतदारसंघात रात्री 9 वाजेपर्यंत मतदान सुरु होतं. ज्या ठिकाणी विरोधकांना पराभवाची भीती होती त्या ठिकाणी सत्ताधा-यांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतदानाची गती कमी केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला.

तर मुंबईत अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर भोंगळ कारभार पाहायला मिळाला. तसंच मतदारांना तासंतास ताटकळत उभं राहावं लागलं. त्यामुळे उद्धव ठाकरे थेट मतदान केंद्रावर पाहणी करण्यासाठी दाखल झाले. संतप्त ठाकरेंनी याला भाजपच जबाबदार असल्याचा आरोप केला. तर पुरावे द्या असं आव्हान भाजपनं ठाकरेंना दिलं.

या प्रकाराला कल्याण-डोंबिवलीही अपवाद नव्हती. डोंबिवलीतला मतदानाच्या गोंधऴाचा वाद थेट मुंबई हायकोर्टात जाणार आहे.. डोंबिवलीतल्या तब्बल 50 हजार मतदारांची नावं मतदान यादीतून वगळण्यात आल्याचा आऱोप करण्यात आलाय...त्यामुळे डोंबिवलीकर हायकोर्टात धाव घेणार आहेत. या सर्व गोंधळाची अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दखल घेत मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश दिल आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विश्वचषक विजेता कर्णधार भ्रष्टाचारात अडकला, कोणत्याही क्षणी अटक होणार? श्रीलंकेत वातावरण तापलं

Christmas Celebration : ख्रिसमस सेलिब्रेशन करायचे असेल तर, मुंबईतील माउंट मेरी चर्चला नक्कीच भेट द्या

Dhurandhar Collection : 'धुरंधर'ची ४०० कोटींकडे वाटचाल; 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार? कपिलचा चित्रपट तिकीट खिडकीवर आपटला, वाचा कलेक्शन

Jio Recharge 2026: JIOने दिली खुशखबर! 2026 मध्ये रिचार्ज होणार स्वस्त, फक्त १०३ रुपयांपासून सुरुवात, वाचा संपूर्ण प्लान...

SAI Recruitment: स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; पगार २.०९ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT