लोकसभा २०२४

Maharashtra Election: संथगतीनं मतदानावरून राजकारण तापलं; मुख्यमंत्री शिंदेंचे चौकशीचे आदेश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तन्मय टिल्लू, साम प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात संथगतीनं झालेल्या मतदानावरून राजकारण पेटलंय. तब्बल तासाभरात केवळ आठ-ते दहा मतदार मतदान करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. त्यामुळेच मुंब्रा,पालघर,नाशिक मतदारसंघात रात्री 9 वाजेपर्यंत मतदान सुरु होतं. ज्या ठिकाणी विरोधकांना पराभवाची भीती होती त्या ठिकाणी सत्ताधा-यांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतदानाची गती कमी केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला.

तर मुंबईत अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर भोंगळ कारभार पाहायला मिळाला. तसंच मतदारांना तासंतास ताटकळत उभं राहावं लागलं. त्यामुळे उद्धव ठाकरे थेट मतदान केंद्रावर पाहणी करण्यासाठी दाखल झाले. संतप्त ठाकरेंनी याला भाजपच जबाबदार असल्याचा आरोप केला. तर पुरावे द्या असं आव्हान भाजपनं ठाकरेंना दिलं.

या प्रकाराला कल्याण-डोंबिवलीही अपवाद नव्हती. डोंबिवलीतला मतदानाच्या गोंधऴाचा वाद थेट मुंबई हायकोर्टात जाणार आहे.. डोंबिवलीतल्या तब्बल 50 हजार मतदारांची नावं मतदान यादीतून वगळण्यात आल्याचा आऱोप करण्यात आलाय...त्यामुळे डोंबिवलीकर हायकोर्टात धाव घेणार आहेत. या सर्व गोंधळाची अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दखल घेत मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश दिल आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Eyes: नजर चांगली ठेवण्यासाठी 'या' ५ गोष्टींनी डोळे ठेवा निरोगी

Guru Gochar: 12 वर्षांनंतर रोहिणी नक्षत्रात गुरू, या 3 राशींचे नशीब सूर्यासारखे चमकेल

Dual-Screen Laptop: जगातील पहिला ड्युअल स्क्रीन लॅपटॉप लॉन्च, Acemagic X1 चे फीचर्स जाणून थक्क व्हाल

Mumbai Local Train: मुंबईत पावसाचा कहर! सीएसएमटी ते मानखुर्द हार्बर लोकल सेवा बंद; नागरिकांचे हाल

Weight Gain Tips: वजन वाढवायचंय? 'या' गोष्टी करुन 30 दिवसात व्हा 'वजनदार' माणूस

SCROLL FOR NEXT