Nilesh Lanke saam tv
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024: 'पाणी नाही मतदान नाही', निघोज ग्रामस्थांच्या निर्णयाचा फटका निलेश लंकेंना बसणार

Mahayuti Candidate Nilesh Lanke: पारनेर मतदार संघाचे माजी आमदार आणि महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठी उभे राहिलेले निलेश लंके यांना त्यांच्या मतदारसंघातील एका गावातून मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Priya More

सुशील थोरात, अहमदनगर

अहमदनगरच्या पारनेर मतदार संघाचे माजी आमदार आणि महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठी उभे राहिलेले निलेश लंके यांना त्यांच्या मतदारसंघातील एका गावातून मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण निघोज या गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पारनेर तालुक्यातील निघोज येथील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीची यात्रा २२ एप्रिलपासून सुरू होत आहे.

या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक हजेरी लावतात. निघोजमधील रांजणखळगे हे जगप्रसिद्ध असल्यामुळे या ठिकाणी उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक पर्यटक रांजणखळगे पाण्यासाठी येत असतात. मात्र सध्या कडक उन्हाळा सुरू असल्यामुळे रांजण खळगे कोरडे पडले आहेत. पाणी नसल्यामुळे या ठिकाणी असलेले मासे मृत पावले आहेत आणि उन्हाळ्यात यात्रा येत असल्यामुळे या ठिकाणी आता यात्रा उत्सव काळात पाण्याची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

निघोज हे गाव आणि रांजण खळगे हे नगर आणि पुण्याच्या हद्दीवर असल्यामुळे या ठिकाणी पुणे जिल्ह्यातून डिंबे धरण आणि कुकडी धरणातून पारनेर तालुक्याला पाणी सोडले जाते आणि त्यामुळेच रांजण खळगे भरण्यासह या परिसरातील शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत असते. मात्र सरकारी लालफितीत अडकलेले पाणी वाटप हे आता उत्सव काळात येणाऱ्या भाविकांना त्रास देण्याची शक्यता आहे.

पाणी नसल्यामुळे यात्रा उत्सव काळात भाविकांना मोठा त्रास होऊ शकतो. निघोज गावकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी अनेक वेळा मागणी करूनही कुकडी कालव्यात पाणी सोडत नसल्यामुळे आता ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या ग्रामस्थांनी 'पाणी नाही तर मतदान नाही' अशी भूमिका घेतली आहे. उत्सव काळात जर कुकडी कालव्यातून नदीला पाणी सोडले नाही तर मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा निघोज ग्रामस्थांनी दिला आहे.

नगर आणि पुणे जिल्ह्याचा अनेक वर्षांचा पाण्याचा वाद आता यात्रा उत्सव काळामध्ये पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. सध्या लोकसभेची निवडणूक असल्यामुळे आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी नाहीतर सरकारी अधिकाऱ्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवावा यात्राउत्सव काळात पाणी प्रश्न सुटला नाही तर आम्ही मतदान करणार नाही, असा पवित्रा आता निघोजकरानी घेतला असल्याचे निघोज गावाचे उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Dora Cake Recipe: लहान मुलांच्या आवडीचा डोरा केक आता बनवा घरी, सोपी आहे रेसिपी

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

Pune Traffic Diversions News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतुकीत आज मोठा बदल; पर्यायी मार्ग कोणते?

SCROLL FOR NEXT