अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे नांदेडमध्ये खिंडार पडलं होतं. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोठा धक्का होता. मात्र नांदेड लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण विजयाच्या उंबरठ्यावर आहेत, त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या जाण्याने काँग्रेसच्या मतदारांमध्ये फारसा फरक पडलं नसल्याचं दिसत नसल्याचं दिसतं आहे. दरम्यान वसंत चव्हाण यांनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
अशोक चव्हाण हे भाजपात का गेले त्याची कारणे वेगळी आहेत. परंतु अशोक चव्हाण यांचे वडील दिवंगत शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष म्हणून नांदेडची जनता राहिली आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. अशोक चव्हाण यांना वाटले मी भाजपात गेलो म्हणजे नांदेडची जनता माझ्यासोबत येईल, पण अशोक चव्हाण यांची अपेक्षा फोल ठरली अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांनी दिली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.