Rahul Gandhi On BJP  Saam Tv
लोकसभा २०२४

Rahul Gandhi: 22 लोकांकडे देशातील 70 कोटी लोकांइतकी संपत्ती, राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

Rahul Gandhi On BJP: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी छत्तीसगडचा दौरा केला.

Satish Kengar

Rahul Gandhi On BJP:

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी छत्तीसगडचा दौरा केला. यावेळी एका निवडणूक सभेला संबोधित ते म्हणाले आहेत की, ''तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की देशातील 22 लोकांकडे देशातील 70 कोटी लोकांइतकी संपत्ती आहे.''

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, ते 24 तास त्या 22 लोकांना मदत करत असतात. बेरोजगारी वाढत आहे, महागाई वाढत आहे. ते म्हणाले की, प्रत्येक राज्यातील लोक तुम्हाला सांगतील की मुख्य मुद्दा बेरोजगारी आणि महागाईचा आहे.

यावरी उपस्थित लोकांना राहुल गांधींनी विचारले की, तुम्ही कधी माध्यमांनी बेरोजगारी, महागाईवर बोलताना पाहिले आहे का? माध्यमे तुम्हाला फक्त पंतप्रधान मोदींना समुद्राच्या तळाशी जाताना किंवा मंदिरात प्रार्थना करताना दाखवेल. प्रसारमाध्यमांना बेरोजगारी आणि महागाईशी काहीही देणेघेणे नाही.

'प्रत्येक महिलेच्या खात्यात दरमहा 8500 रुपये देणार'

यावेळी सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, ''आम्हाला तुमचे जीवन बदलायचे आहे, आम्हाला तुमची मदत करायची आहे. नरेंद्र मोदी उद्योजकांना पैसे देऊ शकतात तर काँग्रेस गरीबांना पैसे देऊ शकते. त्यामुळे आम्ही 'महालक्ष्मी' हे नवीन धोरण आणत आहोत.''

ते म्हणाले, ''निवडणूक जिंकल्यानंतर लगेचच अंमलबजावणी केली जाईल. दारिद्र्यरेषेखालील (BPL) आम्ही प्रत्येक कुटुंबातील एका महिलेची निवड करू आणि आमचे सरकार प्रत्येक महिलेच्या खात्यात दरमहा 8500 रुपये देईल. तसेच आम्ही एका वर्षात महिलांना एकूण एक लाख रुपये देणार आहोत.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wildcat: मांजर कोणत्या बाजूने आडवी गेली तर काय करावं?

Kitchen Hacks: पीठ मळून फ्रिजमध्ये रात्रभर ठेवल्याने शरीराला त्रास होतो का? जाणून घ्या सत्य

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या रोखणार, सरकारचं मोठं पाऊल, टास्क फोर्स नेमकं काय करणार?

Maharashtra Live News Update : राज्यात आज शिवजंयतीचा उत्साह

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

SCROLL FOR NEXT