Relationship Tips Saam TV
लाईफस्टाईल

Relationship Tips : पतीबरोबर कोणत्याच विषयावर मत जुळत नाही, सतत भांडणे होतात? नात्याचा अंत होण्याआधी करा 'या' गोष्टी

Ruchika Jadhav

असे अनेक कपल असतात ज्यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम असते. प्रेम करणाऱ्या व्यक्तींच्या मनात कायम एकमेकांना गमवण्याची भीती असते. त्यामुळे अनेक विषयावर त्यांचे मत जुळत नाही. एखाद्या विषयावर मत न जुळणे सतत वाद होणे या सामान्य गोष्टी आहेत. मात्र आपले नाते तुटूनये घट्ट राहावे यासाठी प्रत्येकाने स्वतःला आणि आपल्या पार्टनरला वेळ दिला पाहिजे.

कोणत्याही दोन व्यक्ती एकत्र राहत असल्यास त्यांच्यात वाद होतात. पती पत्नीच्या नात्यात असा एक काळ येतो ज्यामध्ये दोघेही एकमेकांचा द्वेष करू लागतात. दोघांना देखील एकमेकांचा प्रचंड राग येतो. अशावेळी नातं थेट तुटण्यापर्यंत पोहचतं. नातं तुटल्यावर यातून सावरणे फार कठीण असते. त्यामुळे तुमचं नातं देखील या स्टेजला पोहचलं असेल तर आजच या गोष्टी करा.

स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारा

जर तुमचं नातं सुद्धा तुटण्याच्या वाटेवर आलं असेल तर आधी स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारा की तुम्ही खरोखर तुमच्या पार्टनर शिवाय राहू शकता का? याचं उत्तर हो आलं तर तुम्ही वेगळे व्हा. मात्र मनात नाही उत्तर आलं तर स्वतः ला आणि नात्याला समजून घेण्यासाठी वेळ द्या.

पार्टनरच्या चांगल्या गोष्टी आठवा

प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले आणि वाईट दोन्ही गुण असतात. आपल्याला यामधून आपल्यासाठी जे चांगले आहे ते निवडायचे असते. त्यामुळे तुम्ही सुद्धा जेव्हा जेव्हा तुम्हाला पार्टनरचा खूप राग येईल तेव्हा त्याने तुमच्यासाठी घेतलेली मेहनत आणि चांगल्या गोष्टी आठवा. असे केल्याने तुमचे नाते तुटणार नाही.

पार्टनरकडून असलेल्या अपेक्षा

जर तुमच्या पार्टनरवर तुमचं जास्त प्रेम असेल आणि नातं गमवायचं नसेल तर आधी तुमच्या मनात पार्टनरकडून असलेल्या अपेक्षा थांबवा. अनेकदा पार्टनरने आपल्याला समजून घ्यावं. आपल्याला काय आवडतं आणि काही नाही या गोष्टींची जाणीव त्याला असावी असं प्रत्येकाला वाटतं. मात्र प्रत्यक्षात व्यक्ती स्वतः त्या गोष्टी फॉलो करत नाहीत. त्यामुळे आधी तुम्ही पार्टनरला समजून घ्या.

रागावर नियंत्रण

राग अशी गोष्ट आहे जी अगदी काही क्षणात येते. आपल्याला आनंदी होण्यासाठी बरीच मेहनत करावी लागते. मात्र राग येण्यासाठी काही मेहनत न करता छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आपण रागावतो. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा. जास्त राग आपल्या आरोग्यासाठी आणि नात्यासाठी देखील चांगला नाही. रागात आपण काय बोलतो हे आपल्याला समजत नाही. त्यामुळे पार्टनरचे मन जास्त प्रमाणात दुखावले जाते.

गाणी ऐका

तुमचं नातं तुटत आहे, तुम्ही एकमेकांपासून फार दूर चालले आहेत. मात्र तुम्हाला तुमच्या पार्टनरला गमवायचे नाही? असे असल्यास तुम्ही पार्टनरसाठी सरप्राइज ट्रीप प्लान करा. तुम्ही पुन्हा नात्यासाठी आणि करत असलेली धडपड पाहून पार्टनरच्या मनात तुमच्याबद्दल असलेला राग चुटकी सरशी निघून जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT