Drinking Water Time Saam Tv
लाईफस्टाईल

Drinking Water Time : वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती ? जेवणापूर्वी की, जेवणानंतर

काही लोक जेवल्यानंतर पाणी प्यावे असे म्हणतात, तर काही लोक जेवणापूर्वी पाणी पिण्याची शिफारस करतात.

कोमल दामुद्रे

Drinking Water Time : निरोगी जीवनासाठी दररोज पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. हे केवळ आपल्या शरीराला हायड्रेटेड राहण्यास मदत करत नाही तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकणे, लाळ बनवणे आणि शरीराच्या विविध भागांमध्ये पोषक द्रव्ये पोहोचवणे यासारख्या महत्त्वपूर्ण शारीरिक कार्यांमध्ये देखील मदत करते.

जसे की, जेव्हा आपण पुरेसे पाणी पीत नाही, तेव्हा स्वत:ला आरोग्यविषयक समस्यांसह निर्जलीकरण, मूत्रमार्गात संक्रमण, सांधे आणि स्नायूंच्या समस्या जाणवू लागतात. परंतु, याचे कारण फक्त पुरेसे पाणी पिणे नाही तर त्याची योग्य वेळ देखील ठरवणे गरजेची आहे. (Latest Marathi News)

काही लोक जेवल्यानंतर पाणी (Water) प्यावे असे म्हणतात, तर काही लोक जेवणापूर्वी पाणी पिण्याची शिफारस करतात. आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ रेखा राधामणी म्हणाल्या, "आयुर्वेद पाणी पिण्यासाठी विशिष्ट वेळेची शिफारस करतो आणि ही वेळ (Time) आहे - जेवण करण्यापूर्वी 30 मिनिटे किंवा जेवणानंतर 30 मिनिटे."

त्यांनी म्हटले की, तुम्ही जेवणाच्या 30 मिनिटे आधी किंवा नंतर प्यायला काही फरक पडत नाही, व्यक्तीचे वजन जास्त आहे की कमी आहे हे महत्त्वाचे आहे. याबद्दल सविस्तर माहिती देताना डॉ रेखा म्हणाल्या, "जर ती व्यक्ती अशक्त, थकलेली असेल, वजन वाढवण्याचा प्रयत्न करत असेल आणि एकंदरीत ती खूप सडपातळ दिसत असेल, तर त्याला जेवणानंतर 30 मिनिटांनी पिणे आवश्यक आहे."

याउलट, जर ती व्यक्ती लठ्ठ असेल, जास्त वजन असेल, हार्मोनल असंतुलन असेल किंवा शरीरात भरपूर चरबी असेल तर, "त्याने जेवण करण्यापूर्वी 30 मिनिटे पाणी प्यावे", असे त्यांनी सुचवले.

तथापि, आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ अंशु वात्स्यायन यांच्या मते, जेवणानंतरच पाणी पिण्याची शिफारस केली जाते, आधी नाही. "जेव्हा तुम्ही जेवणाआधी पाणी पितात, तेव्हा पाचक एन्झाईम्स कमकुवत होतात आणि पातळ होतात. अशा प्रकारे, तुम्ही जेवणानंतर ३० मिनिटांनी पाणी प्यावे - तेही अगदी कमी प्रमाणात," असे त्यांनी सांगितले

ते म्हणाले की, प्रत्येक सडपातळ किंवा जास्त वजन असलेल्या व्यक्तीसाठी पाणी पिण्याची वेळ सारखी नसते. हे व्यक्तीवर अवलंबून असते कारण आयुर्वेद मानतो की प्रत्येक माणूस वेगळा आहे. तुम्ही जाड किंवा सडपातळ आहात हे तुमच्या शरीरात असणाऱ्या वात, पित्त आणि कफ दोषांच्या वाढीवर अवलंबून आहे.

ते पुढे म्हणाले की जेवणापूर्वी एक ग्लास पाणी पिल्याने "तुमचे पोट साफ होईल." तज्ज्ञाने indianexpress.com ला सांगितले की, पाण्याचा वापर हा ऋतू आणि आपण राहतो त्या ठिकाणावर देखील अवलंबून असतो, जिथे तुमची पचनसंस्था प्रत्येक ऋतूनुसार वेगळी असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास दिरंगाई; पेणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिक मागो आंदोलन

Diwali Bad Impact: दिवाळीत 'या' 5 चुका मुळीच करू नका, भोगावे लागतील मोठे परिणाम

Maharashtra Live News Update : प्रेमाला विरोध; तरुण तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या परिसरात हळहळ

IND Vs AUS : रोहित-विराटचा कमबॅक फसला, गिल-अय्यरही फ्लॉप; ऑस्ट्रेलियाचा भारतावर सहज विजय

JEE Exam 2026: जेईई मेन्स सेक्शन १ आणि २ परीक्षांच्या तारखा जाहीर, कधीपासून अन् कसं रजिस्ट्रेशन करायचे?

SCROLL FOR NEXT