kitchen Tips and Tricks, Kitchen Hacks  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Kitchen Hacks: अंड्याच्या उग्रवासापासून सुटका हवी आहे तर या टिप्स फॉलो करा

अंड्याचा उग्र वास घालवण्यासाठी या टिप्स फॉलो करा.

कोमल दामुद्रे

मुंबई : शरीरासाठी अंड हे अधिक फायदेशीर असते. अंड्याचे सेवन केल्याने जीवनसत्त्वे अ, ब, ब -१२, ड, कॅल्शियम आणि जीवनसत्त्व ई शरीरासाठी अधिक फायदेशीर असतात. (Kitchen Tips and Tricks)

हे देखील पहा -

सकाळी सकाळी उठल्यानंतर आपल्यापैकी बरेच जण नाश्त्यासाठी अंडी खातात. अंड्यापासून ऑम्लेट, भूर्जी व त्याच्या पिवळ्या भागाचा देखील अधिक प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे अंडी खाल्ल्याने हाडे झिजण्यापासून बचाव करता येतो. हाडांची योग्य प्रकारे योग्य वेळी वाढ होते. अंडी खाल्ल्याने आपल्याला भूक आपला कमी लागते परंतु अंडी उकडवल्यानंतर किंवा त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवल्यानंतर आपल्या घरातील भांड्यांमधून उग्र वास करु शकतो. कधी कधी स्वयंपाकघरातून (Kitchen) अंड्याचा वास जात नाही अशावेळी काय करायला हवे ते जाणून घेऊया.

अंड्याचा उग्र वास कसा दूर करण्यासाठी या टिप्स फॉलो करा-

१. स्वयंपाकघरातून अंड्याचा उग्रवास येत असेल तर आपण बेकिंग सोड्याचा वापर करुन भांडी फ्रेश व क्लीन करु शकतो. बेकिंग सोडा भांड्यांमध्ये थोडा वेळ ठेवून नंतर स्वच्छ पाण्याने धुवावे. उग्रवास दूर होण्यास मदत होईल.

२. भांड्यांना अंड्याचा उग्र वास येत असेल तर त्यात थोडे बेसन घालून ते चांगल्याप्रकारे भांड्यांना चोळा. त्यांना भांड्यांना तसेच ठेवावे. पाण्याने धुवून घ्या. वास जाण्यास मदत होईल.

३. अंड्याचा उग्र वास येत असेल तर आपण लिंबूचा वापर करु शकतो. भांड्यात लिंबाचे काही थेंब घालून तसेच ठेवा. आपण त्यासोबत विनेगरचा देखील वापर करु शकतो. त्यांनंतर भांड्यात पाणी (Water) घेऊन गरम करा. वास सहज जाईल.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT