Chanakya Niti Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti : बायकांनो, नवऱ्यापासून लपवून ठेवा या गोष्टी अन्यथा, संसार होईल उद्धवस्त !

Chanakya Thoughts : चाणक्य नीतीमध्ये त्यांनी अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या चुकूनही आपल्या पतीला सांगू नयेत.

कोमल दामुद्रे

Husband-Wife Relationship : आचार्य चाणक्य म्हणतात की पती-पत्नी दोघेही एकमेकांना पूरक आहेत. चाणक्य नीतीमध्ये त्यांनी अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या चुकूनही आपल्या पतीला सांगू नयेत.

असे केल्याने नात्यात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे. तुम्हालाही तुमचे वैवाहिक (Marriage) जीवन सुखी ठेवायचे असेल तर आचार्य चाणक्य यांच्या या गोष्टी अवश्य पाळा.

1. आचार्य चाणक्य सांगतात की, लग्नानंतर महिलांनी (Women) माहेरबद्दल कधीही सांगू नये. या गोष्टी तुमच्या पतीसोबतही शेअर करू नका. असे केल्याने दोन कुटुंबात (Family) मतभेद होऊ शकतात. आणि याचा पती-पत्नीच्या नात्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो.

2. एका हाताने दिलेल्या दानाची दुसऱ्या हातालाही कल्पना नसते तेव्हाच माणसाला दानाचे फळ मिळते असे म्हणतात. सांगायचे तात्पर्य की तुम्ही दिलेल्या दानाची स्तुती कोणाच्याही समोर करू नका, असे केल्याने त्याचा परिणाम संपतो. पत्नीने पतीसमोरही याचा उल्लेख करू नये.

3. चाणक्य धोरणानुसार, पत्नीने आपल्या पतीच्या किंवा स्वतःच्या कमाईतील काही हिस्सा नेहमी साठवून ठेवला पाहिजे आणि त्याबद्दल पतीलाही सांगू नये. कुटुंबाच्या कठीण काळात हा पैसा खूप उपयोगी पडू शकतो.

4. पत्नींनी आपल्या पतीची तुलना इतर पुरुषांशी कधीही करू नये. असे केल्याने पतीचा स्वाभिमान दुखावतो आणि वैवाहिक जीवनात तणावही निर्माण होतो. चाणक्याच्या मते, पती-पत्नीने एकमेकांशी नेहमी सभ्य वागणूक ठेवावी.

5. रागावर नियंत्रण ठेवणाऱ्या व्यक्तीचे वैवाहिक जीवन यशस्वी होते, असे चाणक्य सांगतात. रागाच्या भरात माणूस चांगल्या वाईटात फरक करू शकत नाही. त्यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नागपुरात पाण्याच्या टाकीचा स्फोट; ६ जणांचा मृत्यू, दुर्घटनेतील मृतांची नावे आली समोर

Warm Water Benefits: जेवल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

Maharashtra Live News Update: वाशिमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचाराचे बॅनर,पोस्टर आणि फ्लेक्स काढले

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

SCROLL FOR NEXT