Bottled Water yandex
लाईफस्टाईल

Bottled water safety: बाटलीबंद पाणी किती दिवस सुरक्षित असतं? एक्सपायरी डेटमागचं खरं कारण जाणून घ्या

bottled water shelf life: बाटलीबंद पाणी किती दिवस सुरक्षित असतं? पाण्याला एक्सपायरी डेट असते का? प्लास्टिकच्या बाटलीत साठवलेल्या पाण्याची क्वालिटी कशी बदलू शकते आणि ते सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

पॅकेज्ड किंवा बाटलीबंद पाणी हे प्रवासात किंवा कामाच्या ठिकाणी सहज उपलब्ध होतं. त्यामुळे हे पाणी तहान भागवण्याचा सोपा पर्याय मानला जातो. त्यामुळे अनेक जण दररोज बाटलीबंद पाणी पिण्याचा मार्ग वापरतात. पण एक प्रश्न अनेकांना पडतो बाटलीतील पाणी किती काळ सुरक्षित असतं? प्रत्यक्षात पाणी खराब होत नाही, पण ते ज्या प्लास्टिकच्या बाटलीत ठेवलं जातं त्याची क्वालिटी, साठवण्याची पद्धत आणि सूर्यप्रकाशाचा संपर्क यामुळे त्याच्या चवीवर परिणाम होऊ शकतो.

बाटलीबंद पाण्याला एक्सपायरी डेट असते का?

खरं तर पाण्याला स्वतःची एक्सपायरी डेट नसते. मात्र प्लास्टिकच्या बाटल्यांमुळे पाण्याच्या क्वालिटीमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे कंपन्या बाटलीवर 'बेस्ट बिफोर' किंवा एक्सपायरी छापतात. ही तारीख त्या प्लास्टिकची शेल्फ लाईफ आणि पाणी किती काळ ताजं राहू शकतं यावर आधारित असतं.

साधारणपणे सीलबंद बाटलीतील पाणी १ ते २ वर्षांपर्यंत टिकू शकतं. ही तारीख उलटल्यानंतरही पाणी पिण्यासाठी धोकादायकच असेल असं नाही. पण त्याची चव बदलू शकते. बाटल्या चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास प्लास्टिकमधील काही रसायनं हळूहळू पाण्यात मिसळण्याची शक्यता असते.

बाटलीबंद पाणी सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावं?

पाण्याची क्वालिटी टिकवून ठेवण्यासाठी ते योग्य पद्धतीने साठवणं खूप महत्त्वाचं आहे. या काही साध्या गोष्टी लक्षात ठेवा-

  • बाटल्या नेहमी थंड आणि काळोख असलेल्या ठिकाणी ठेवा. थेट सूर्यप्रकाश किंवा उष्णतेजवळ ठेवणं टाळा.

  • उन्हाळ्यात किंवा गरम हवामानात गाडीत पाण्याच्या बाटल्या जास्त वेळ ठेवू नका.

  • पाणी तीव्र वास असलेल्या वस्तूंच्या जवळ ठेवू नका. कारण पाणी सहज वास शोषून घेऊ शकतं.

  • एकदाच वापरण्यासाठी असलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या पुन्हा पुन्हा वापरू नका.

बाटलीतील पाणी सुरक्षित नसल्याची लक्षणं

  • पाण्याला विचित्र किंवा रासायनिक वास येणं

  • पाणी धूसर दिसणं किंवा त्यात काही कण तरंगताना दिसणं

  • बाटली फुगलेली, तुटलेली किंवा लीक झालेली असणं

  • अशी कोणतीही लक्षणं दिसली तर आरोग्याच्या दृष्टीने ते पाणी पिऊ नका.

योग्य पद्धतीने साठवलेलं प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी साधारण १ ते २ वर्षे सुरक्षित राहू शकतं. जरी पाणी आपोआप खराब होत नसलं तरी त्याची बाटली आणि साठवणूक यांचा त्याच्या क्वालीटीवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे पाणी पिण्यापूर्वी बाटलीची स्थिती, वास आणि चव तपासणं आवश्यक आहे. थंड आणि अंधाऱ्या ठिकाणी पाणी ठेवलं तर ते अधिक काळ चांगलं राहतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Tourism : गर्दीपासून दूर! वीकेंडला पालघरला फिरायला जा, पाहा 'हे' ऑफबीट पर्यटन स्थळ

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अमित शहा- राज्य मंत्रिमंडळाची ४५ मिनिटे बैठक, तोडगा काय निघाला?

Pune Porsche Accident: पोर्शे कार अपघात प्रकरण, जेलवारी करूनही अग्रवाल कुटुंबीयांचा माज उतरला नाही; धक्कादायक VIDEO चर्चेत

Thursday Horoscope: स्वामींच्या कृपेने अडथळे दूर होणार! ५ राशींना कामाच्या नव्या संधी मिळणार

Maharashtra News Live Update: पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात अमरावतीत युवक काँग्रेसचे आंदोलन मेलोडी चॉकलेट वाटून मोदी सरकारचा निषेध

SCROLL FOR NEXT