Travel Saam Tv
लाईफस्टाईल

Travel: परदेशी पर्यटकांना भारतातील 'या' जागेचे अधिक आकर्षण !

भारतात अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत, जी पर्यटकांना भूतकाळात घेऊन जातात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Travel : भारतात अनेक ऐतिहासिक (Historical) ठिकाणे आहेत, जी पर्यटकांना भूतकाळात घेऊन जातात. प्राचीन भारतातील कला आणि वास्तुकला डोळ्यांना (Eyes) आनंद देते. आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत की परदेशी पर्यटकांना कोणत्‍या भारतीय ठिकाणांना भेट द्यायला आवडते.

भारत हा एक असा देश आहे जो आपल्या वैविध्यपूर्ण संस्कृती आणि परंपरांसाठी जगभरात ओळखला जातो. भारत आपल्या स्वादिष्ट भोजन आणि आदरातिथ्यासाठी देखील ओळखला जातो. आज आम्ही तुम्हाला परदेशी पर्यटकांना भारतातील कोणती शहरे सर्वात जास्त आवडतात हे सांगणार आहोत.

Red Fort

दिल्ली:

भारताची राजधानी दिल्ली आपल्या सुंदर कला आणि वास्तुकलेसाठी ओळखली जाते. दिल्ली आपल्या स्ट्रीट फूड, कपडे, प्राचीन वास्तुकला आणि अद्भुत लोकांसाठी देखील प्रसिद्ध आहे, विदेशी पर्यटक दिल्लीतील लाल किल्ला, कुतुबमिनार, जामा मशीद, अक्षरधाम मंदिर आणि कॅनॉट प्लेस सारख्या ठिकाणी फिरताना दिसतील.

Taaj Mahal

आग्रा :

ताजमहाल जगभरात प्रसिद्ध आहे. ताजमहाल व्यतिरिक्त, आग्रा शहरात फतेहपूर सिक्री, आग्रा किल्ला, मेहताब बाग इत्यादीसारख्या इतर अनेक उल्लेखनीय मुघलकालीन वास्तू आहेत. यमुना नदीच्या काठावर वसलेले हे शहर दिल्लीपासून 210 किमी अंतरावर आहे.

Sikkim

सिक्कीम:

सिक्कीम हे भूतानच्या जवळ आहे आणि हळूहळू पर्यटकांमध्ये लोकप्रिय होत आहे. याक राईड हा असाच एक उपक्रम आहे, जो लोकांना खूप आवडतो.

Ladakh

लडाख :

देशाचे असे राज्य आहे, जिथे देश-विदेशातूनच नव्हे तर परदेशातूनही मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. शहराच्या गजबजाटापासून दूर असलेल्या या थंड वाळवंटाचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक देशभरातून येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Jyoti Chandekar: 'तू फसवलंस आजी...'; पूर्णा आजीला निरोप देताना 'ठरलं तर मग' परिवाराचे अश्रू अनावर

GK: स्मशानभूमीतून घरी परतल्यानंतर आपण आंघोळ का करतो?

Parali News : पुराच्या पाण्यात कार गेली वाहून; तिघांना वाचविण्यात यश, एकाचा शोध सुरू

Mumbai School Bus : माणुसकी! मुंबईला पावसाचा तडाखा, स्कूल बस अडकली पाण्यात, धो धो पावसात पोलिसांनी मुलांना वाचवले

SCROLL FOR NEXT