Chanakya Niti On Success Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Success : आयुष्यात मोठी झेप घेताना चाणक्यांचे हे विचार लक्षात घ्या, अन्यथा...

Chanakya Niti : आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतीशास्त्रामध्ये अनेक मोठ्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचे काही शब्द आजही लोकांसाठी प्रेरक ठरत आहेत. वेद, शास्त्रे आणि अर्थशास्त्र यांचे सखोल ज्ञान असलेले ते निपुण विद्वान होते.

Shraddha Thik

Successful Life :

आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतीशास्त्रामध्ये अनेक मोठ्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचे काही शब्द आजही लोकांसाठी प्रेरक ठरत आहेत. वेद, शास्त्रे आणि अर्थशास्त्र (Economics) यांचे सखोल ज्ञान असलेले ते निपुण विद्वान होते. चाणक्य हे त्याच्या मत्सुदीसाठीही ओळखले जातात. त्यांनी आपल्या धोरणातून मानवी हित आणि कल्याणाविषयी सांगितले आहे.

आज आम्ही तुम्हाला चाणक्यांच्या एका धोरणाविषयी सांगणार आहोत ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की जीवनात (Life) काही निर्णय खूप विचारपूर्वक घेतले पाहिजेत. यामागील चाणक्य धोरण काय आहे ते जाणून घेऊया.

आचार्य चाणक्य यांचे धोरण पुढीलप्रमाणे -

कर्मायत्तं फलं पुंसां बुद्धि: कर्मानुसारिणी।

तथापि सुधियश्चार्याः सुविचार्यैव कुर्वते॥

आचार्य चाणक्य आपल्या नीतीमध्ये कर्माबद्दल स्पष्टीकरण देताना म्हणतात की, कर्माचे फळ व्यक्तीच्या कृतीत दिसते. मानवी बुद्धी देखील कर्मानुसार कार्य करते. तरीही शहाणी माणसे नीट विचार करूनच कोणतेही काम सुरू करतात. विचार न करता कोणतेही काम केल्यास यश मिळणार नाही. कोणतेही काम करण्यापूर्वी चांगले प्लानिंग बनवा आणि मग त्या कामात गुंतून राहा, यश नक्कीच मिळेल.

काहीही करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा

चाणक्य म्हणतो की, मनुष्याला त्याच्या कर्मानुसार फळ मिळते. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करून मूल्यमापन करूनच कामाचा विचार व्हायला हवा, असे ते म्हणतात. एकूणच विचार न करता कोणतेही काम अचानक सुरू करणे योग्य नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. आपण जे काही काम करणार आहोत, त्याचा आधी गांभीर्याने विचार करा आणि ते काम योग्य तयारीने केले तर बरे. जीवनात निर्णय घेणे महत्वाचे आहे पण त्यासाठी विचारपूर्वक विचार करणे आवश्यक आहे.

घाईघाईने निर्णय घेणारी माणसे प्रत्येक पावलावर निराश होतात, तर कुठलेही काम चोख नियोजन करून केले, तर हे काम मी का करतोय आणि त्याचे फळ काय असेल, हे मनाशी स्वीकारले जाते. एकदा मनाने एखादी गोष्ट स्वीकारली की, माणूस कितीही वेळा निराश झाला तरी त्याची हिंमत खचत नाही. मनाने हरणारे पराभूत होतात, मनाने जिंकणारे विजयी होतात, असेही म्हणतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

Maharashtra Politics : शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची भेट;महापालिकेची रणनिती ठरली? VIDEO

Astrology: 'या'५ राशींवर होणार धनवर्षाव, द्विद्वाद योगामुळे होतील मोठे फायदे

SCROLL FOR NEXT