Benefits Of Fasting : आपल्याकडे उपवास करण्याची परंपरा खूप शतकापासून सुरू आहे. लोकं प्रत्येक देवानुसार आठवड्यातून एक दिवस उपवास करतात आणि पूजा करतात. परंतु उपवासाला केवळ धार्मिकतेचे कारण जोडणे योग्य नाही, आता लोक उपवासाला विज्ञानाची जोड देवू पाहतात.
उपवास करण्याचे वैज्ञानिक दृष्ट्या अनेक चांगले फायदे आहेत. त्यामुळे वेळोवेळी उपवास करून शरीर कसे निरोगी (Healthy) ठेवता येईल. यासोबतच ज्यांना उपवास (Fasting) करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. चला तर मग पाहूयात.
उपवास का ठेवावा -
आठवड्यातून एकदा किंवा अधूनमधून उपवास करणे म्हणजेच शरीर शुद्ध करण्याचा एक उत्तम मार्ग असू शकतो. त्यामुळे पचनसंस्था स्मच्छ आणि निट होऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपवासाच्या दिवशी शरीर आपली ऊर्जा स्वतः दुरुस्त करण्यासाठी मदत करते. बऱ्याच लोकांना उपवास केल्याने मजबूत रोगप्रतिकारशक्ती आणि चांगल्या मानसिक स्पष्टतेचा अनुभव येतो.
उपवास कोणी करू नये -
वैद्यकीय सल्ला शिवाय उपवास करू नका. जर तुम्ही उपवास करण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे जर तुम्हाला आधीपासून औषधे सुरू असतील तर डॉक्टरांचा सल्ला खूप महत्त्वाचा आहे.
वास्विक उपवास करणे प्रत्येकासाठी योग्य नसते खरं सांगायचं तर त्याचे धोके असू शकतात, ज्या लोकांना शुगर,लो ब्लड प्रेशर आणि खाण्यापिण्याच्या विकाराबद्दल वैद्यकीय समस्या असतात. गरोदर स्त्रिया, स्तनपात करत आहेत आणि अनियमीत आहाराच्या सवयी त्यांनी देखील उपवास करणे टाळवा.
उपवास करण्याचे फायदे काय आहेत?
योग्य पद्धतीने जर तुम्ही वैद्यकीय सल्लयासोबत उपवास केला तर तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायद्यांचा लाभ होईल. उपवासाचे आरोग्याला होणारे फायदे पुढील प्रमाणे सांगितले आहे.
वजन कमी करण्यासाठी -
आठवड्यातून एकदा जरी उपवास केला तरी कॅलरी कमी होण्यास मदत होते.परिणामी वजन कमी होते आणि शरीर रचना सुधारते.
हृदयासाठी फायदेशीर -
उपवासमुळे हृदयाशी संबंधित अनेक फायदे होतात.त्यामध्ये रक्तदाब कोलेस्ट्रॉलची पातळी आणि ऑक्सीडेटिव्ह तणाव सुधारतो, हे सर्व हृदयाच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाचे घटक आहेत त्यामुळे हे निरोगी राहणे महत्त्वाचे असते.
वर्धित मानसिक स्पष्टता -
उपवास केल्याने मानसिक स्पष्टता आणि लक्ष केंद्रित होते.असे काही लोकांचा विश्वास आहे. मेंदू-व्युत्पन्न न्यूरोट्रॅफिक फॅक्टर आणि मेंदूसाठी इतर फायदेशीर रसायनाची निर्मितीमध्ये सहकार्य करते.
इन्सुलिन संवेदनशीलता -
इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यासाठी उपवास फायदेशीर आहे.ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी आणि टाईप टू मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी महत्त्वाचे आहे.
सुजन कमी करण्यासाठी -
शरीरावर असलेली सुजन कमी करण्यासाठी उपवास मदत करते . जर ही सुजन खूप जुन्या आजाराशी संबंधित आहे तर त्यावर अधिक प्रभावीपणे काम करते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.