अभिनेत्री अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी ही लोकप्रिय जोडी आहे. या दोघांनी तुझ्यात जीव रंगला या मालिकेत काम केले आहे.
मालिकेत त्यांनी राणा दा आणि पाठक बाई हे पात्र साकारले होते. या दोघांनी रिअल लाइफमध्येही लग्नगाठ बांधली आहे. त्यांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.
तुझ्यात जीव रंगला मालिकेचे शुटिंग ५ वर्ष सुरु होते. याच काळात त्यांची मैत्री झाली. त्यांच्या कुटुंबियांमध्येही ओळख झाली.
हार्दिक आणि अक्षयाच्या लव्हस्टोरी त्यांच्या कुटुंबाने महत्त्वाचे काम केले आहे. हार्दिकच्या आईला अत्रया खूप आवडायची.
मालिका संपल्यावर हार्दिकच्या आईने त्याला लग्न करण्याचा सल्ला दिला.परंतु त्याने हे मनावर घेतले नाही. त्याच्या आईने अक्षयाला लग्नाविषयी विचारण्यासाठी सांगितले.
यानंतर हार्दिकने आईसाठी अक्षयाला लग्नाबाबत विचारायचे ठरवले. त्यानंतर त्याने अक्षयाला विचारले. तेव्हा अक्षयाने लग्नासाठी काहीच हरकत नसल्याचे सांगितले.
अक्षयाने हार्दिकसमोर एक अट ठेवली होती. त्याने तिच्या घरी जाऊन बोलावे, असं सांगितलं होतं. त्याचप्रमाणे हार्दिकने अक्षयाच्या घरी जाऊन मागणी घातली. त्यानंतर त्यांचे लग्न ठरले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.