ज्योतिषशास्त्रानुसार काही ग्रहांच्या युतींना अत्यंत मंगलकारी मानली जाते. जर अशा युती कुणाच्या जन्मकुंडलीत घडल्या तर त्या व्यक्तीचं जीवन समृद्ध होतं आणि त्याला वैभव, सुखसोयी मिळतात. यातीलच एक महत्त्वाची युती म्हणजे सूर्य आणि बुध यांच्या संयोगातून घडणारी बुधादित्य राजयोगाची निर्मिती.
यंदा ही विशेष युती १७ सप्टेंबर रोजी कन्या राशीत घडणार आहे. या काळात तीन राशींच्या व्यक्तींचं भाग्य उजळणार आहे. उत्पन्नवाढ, पदोन्नतीचे योग तर आहेतच शिवाय संतती संबंधित शुभ वार्ताही मिळू शकणार आहे. यावेळी कोणत्या राशी लकी ठरणार आहेत ते पाहूयात.
सूर्य आणि बुध यांची युती करिअर आणि व्यवसायाच्या स्थानी होत असल्याने धनुराशीच्या व्यक्तींना या काळात मोठा लाभ होणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ विशेषतः प्रगतीदायी ठरणार आहे. मेहनतीमुळे समाधान मिळणार आहे. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी आत्मविश्वास वाढणार आहे.
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी ही युती दुसऱ्या भावात होणार आहे. यामुळे अचानक धनलाभाचे योग प्रबळ आहेत. नोकरीत बदल शोधणाऱ्यांसाठी किंवा उच्च पदासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठीही हा काळ फायद्याचा ठरणार आहे. या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वात तेज वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्वांची मदत मिळणार आहे.
वृश्चिक राशीच्या व्यक्तींकरिता सूर्य–बुध युती लाभभावात होत असल्याने उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. जुने गुंतवणुकीचे निर्णय आता फायदेशीर ठरणार आहेत. शेअर बाजार, सट्टा किंवा लॉटरीमधूनही लाभ मिळण्याचे योग आहेत. रोजगार शोधणाऱ्यांना प्रामाणिकपणामुळे संधी प्राप्त होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.