नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन राज ठाकरेंनी मोदी सरकारला तिखट प्रश्न विचारलाय. देश म्हणजे धर्मशाळा नाही अशा शब्दात राज यांनी भूमिका स्पष्ट केलीय.
नागरिकत्व सुधारणा कायद्यावरनं देश पेटलाय. विरोधी पक्ष या कायद्याला कडाडून विरोध करतायंत, तर मोदी सरकार या कायद्याचा जोरदार बचाव करतंय. याचसंबंधी राज ठाकरेंनी मोदी सरकारला तिखट प्रश्न विचारलाय. देश म्हणजे धर्मशाळा आहे का ? असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय.
135 कोटींच्या भारताला आणखी लोकांची गरज नाही अशी कणखर भूमिका राज ठाकरेंनी घेतलीय. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरनं देश पेटत असताना आता राज ठाकरेंनी आता या वादंगात उडी घेतलीय.
Web Title - Raj Thakerey Statement About CAA and NRC
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.