Gurucharan Singh News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gurucharan Singh News : 'तारक मेहता...' फेम गुरूचरण सिंह २५ दिवस कुठे होता ? महिन्यानंतर अभिनेत्याने सांगितलं खरं कारण

Gurucharan Singh On His Disappearance : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम गुरूचरण सिंह सोढी एप्रिल महिन्यामध्ये २५ दिवस बेपत्ता झाला होता. कोणत्या कारणासाठी अभिनेत्याने हे पाऊल उचलले ? या प्रश्नाचं गुरुचरण सिंहने उत्तर दिले आहे.

Chetan Bodke

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम गुरूचरण सिंह सोढी एप्रिल महिन्यामध्ये २५ दिवस बेपत्ता झाला होता. त्यानंतर तो घरी परतला. ते २५ दिवस अभिनेता नेमका कुठे होता ? हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. अभिनेता त्यावेळी गुरूद्वारेत सेवा करण्यासाठी आणि आध्यात्मिक प्रवासासाठी गेलो असं त्याने स्वत: सांगितले होते. कोणत्या कारणांनी आपण हे पाऊल उचलले या प्रश्नावर गुरुचरण सिंहने उत्तर दिले आहे.

अभिनेता बेपत्ता झाल्यानंतर सोशल मीडियावर तो आर्थिक अडचणींमुळे गायब झाल्याची चर्चा झाली होती. अशा अनेक उलट सुलट चर्चा सोशल मीडियावर झाल्या होत्या. बेपत्ता होण्याच्या चर्चांवर अभिनेत्याने उत्तर दिले आहे.

गुरूचरण सिंह सोढीने सांगितले की, "मी बेपत्ता होण्याचं कारण कर्जबाजारी किंवा कर्ज फेडू शकत नाही असं नाही. कर्जाचं ओझं माझ्यावर आजही आहे. माझा हेतू चांगला आहे. त्याशिवाय मी कर्ज घेतलं असलं तरीही क्रेडिट कार्ड आणि ईएमआयचा हफ्ता भरत आहे. मी गेल्या ४ वर्षांपासून नवीन कामाच्या शोधात आहे, पण मला सर्वच ठिकाणी नकारच मिळत होता."

अभिनेत्याने बेपत्ता होण्याचे कारण सांगताना पुढे सांगितले की, "मी २५ दिवस अज्ञात स्थळी घालवल्यानंतर आणि एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी गेल्यानंतर, मी आता एक व्यक्ती म्हणून बदललो आहे. मी २५ दिवसात सगळं जग पाहिले आहे. २५ दिवस मी एका आध्यात्मिक प्रवासासाठी गेलो होतो. यामध्ये मी कोणताही पब्लिसिटी स्टंट केलेला नाही. मला पूर्वी हे शब्द सुद्धा माहिती नव्हते. जो पर्यंत पैशांचा प्रश्न आहे, तोपर्यंत मी अनेक मोठ मोठे निर्णय घेतले आहेत.

इतकं सर्व आलबेल सुरू असताना, तुम्ही पळून जाण्याचा का विचार केला ? असा प्रश्न गुरूचरणला विचारण्यात आला होता. आपल्या जवळच्या लोकांमुळे मनाला वेदना झाल्यामुळे मी पळून जाण्याचा निर्णय घेतला होता. असं गुरुचरण सिंहने सांगितले. "आयुष्यात असे काही दिवस येतात, जे तुम्ही तुमच्या कुटुंबापासून आणि जगापासून दूर जाता. नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करूनही मी माझ्या जवळच्या लोकांवर नाराज होतो. मला सतत नकाराचा सामना करावा लागत होता. मला माहीत होते की काहीही झाले तरी मी आत्महत्येचा विचार करणार नाही." असं अभिनेत्याने २५ दिवस कुटुंबापासून अज्ञातस्थळी जाण्यामागचे कारण सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: साई मंदिरात फोडली दहीहंडी

Mirchi Bhaji: पावसाळ्यात बनवा कुरकुरीत अन् खमंग मिरची भजी; सोपी रेसिपी वाचा

NCERT Partition Module : भारत-पाकिस्तान फाळणीचं नवं मॉड्यूल; काँग्रेस जबाबदार, नेहरूंच्या भाषणाचाही दाखला

गोविंदांनी उंच मनोऱ्यावर केला ‘छावा’चा सीन; मुख्यमंत्र्यांनी टाळ्या वाजवून दिली दाद |VIDEO

Peacock Feather Benefits: मोरपिस खिशात ठेवण्याचे फायदे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT