Faisal Malik On Kangana Ranaut Joins Politics Saam Tv
मनोरंजन बातम्या

Faisal Malik Interview : 'राजकारणात सेलिब्रिटींनी पडू नये...', कंगना रणौतच्या राजकारणातल्या एन्ट्रीवर 'पंचायत' फेम अभिनेत्याचं मत

Faisal Malik On Kangana Ranaut Joins Politics : 'पंचायत' फेम अभिनेता फैजल मलिकने एका कंगना रणौतच्या राजकारणातील प्रवेशावर भाष्य केले आहे. त्यासोबतच त्याने वेगवेगळ्या मुद्द्यांवरही भाष्य केले आहे.

Chetan Bodke

सध्या 'पंचायत ३' (Panchayat 3) वेब सीरिजची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या सीरीजची उत्सुकतेने वाट बघत होते. नुकतीच ही सीरिज ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज झाली आहे. सीरजमध्ये प्रल्हाद ही भूमिका अभिनेता फैजल मलिक (faisal malik) याने साकारली आहे. नुकतंच अभिनेत्याने टिव्ही ९ भारतवर्षला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. मुलाखतीत अभिनेत्याने कंगना रणौतच्या राजकारणातील प्रवेशावर भाष्य केले आहे.

फैजल मलिकने कंगना रणौतसौबत 'रिवॉल्वर रानी' चित्रपटामध्ये काम केले आहे. तर त्याने मुलाखतीमध्ये, शुटिंगबद्दलचा किस्सा शेअर केलेला आहे. कंगनाबद्दल बोलताना अभिनेता फैजल मलिक म्हणाला, "कंगना रणौत एक उत्तम महिला आहे. पूर्वी ती अश नव्हती वागत. आता असं वाटतंय की, तिच्या ऐवजी दुसरंच कोण तरी असं वागत आहे. माझ्या अंदाजे, सेलिब्रिटींचं काम हे अभिनय करणं आहे, त्यांनी अभिनयच करावा. बाकी इतर गोष्टींचा त्यांनी विचार करु नये. तिची बहिण आणि मी एकमेकांना खूप चांगले ओळखतो. रंगोली रणौतनेही माझ्यासोबत काही चित्रपटांत काम केलेले आहे. आम्ही दोघंही दीड वर्षे एकाच ऑफिसमध्ये होतो."

यावेळी अभिनेत्याने कंगनाच्या अभिनयाचेही कौतुक केले. फैजल मुलाखतीत म्हणाला, "कंगना सारखा अभिनय कोणीही करु शकत नाही. कंगनाकडे स्वत:चे कौशल्य गुण आहेत. पण गेल्या काही दिवसांमध्ये नेमकं तिला काय झालं आहे, हे माहित नाही. मला वाटते की अभिनेत्याने खूप मेहनतीने शिकलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे." फैजल पुढे म्हणाला की, कंगनाने अभिनय सोडू नये, अभिनय सोडणं चुकीचं आहे. तिने अभिनयासाठी आणखी काम करावं.

सध्या अनेक सेलिब्रिटी राजकारणात प्रवेश करीत आहेत, यावर त्याने आपले परखड मत मांडले आहे. तो म्हणाला, "सेलिब्रिटींनी राजकारणात प्रवेश करू नये. कारण राजकारण करण्याचं काम हे राजकारण्यांचंच असतं. जर तुम्ही समाजासाठी काही करु इच्छित आहात, तर खासदार बनून संसदेत जा. लोकप्रतिनिधी बनून लोकांची सेवा करा. माझ्या अंदाजे राजकारण हे असे काम आहे, जे तुम्हाला वर्षाचे ३६५ दिवस ॲक्टिव्ह राहून काम करावे लागते. राजकारण्याच्या नोकरीत तुम्हाला २४ X ७ काम करावे लागते. राजकारणी बनण्याची गरज कोणत्या सेलिब्रिटीचं नाही तर, कोणत्या तरी कार्यकर्त्याचं आहे. मला वाटतं ज्याचं त्याचं काम ज्याने त्यानेच करावे. "

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला भावाला या रंगाची राखी बांधू नका; नाहीतर...

Baba Vanga : बाबा वेंगाच्या Double Fire च्या भविष्यवाणीने उडेल थरकाप; ऑगस्टमध्ये काहीतरी मोठं घडण्याचं भाकित

Maharashtra Live News Update : नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविरुद्ध स्थानिकांचे आणि माजी नगरसेवकांचे साखळी उपोषण

Ind Vs Eng Test : कसोटी मालिका संपली, पण वाद संपेनात! भारताच्या महान क्रिकेटपटूचा अपमान केला?

राजकारणात हालचालींना वेग! एकनाथ शिंदेंची दुसऱ्यांदा रात्री उशिरा दिल्लीवारी; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT