Salman Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan: सलमान खानला माफ करा, राखी सावंतनं बिश्नोई समाजाची मागीतली माफी, Video व्हायरल!

Manasvi Choudhary

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा सध्या जबरदस्त चर्चेत आहे. अभिनेता हा त्याच्या चित्रपटामुळे नाही तर वैयक्तिक घडामोडींमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीची हत्या झाली. बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्विकारली असल्याचं स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर आता सलमान खानच्या जिवाला देखील धोका असल्याची माहिती आहे. अशातच आता बॉलिवूडची कॉमेडीक्वीन राखी सांवतचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.

राखीने तिच्या व्हिडीओमध्ये, "नमस्कार मी राखी सांवत, सलमान खानच्यावतीने मी बिश्नोई समाजाची माफी मागते. प्लिज तुम्ही त्याला माफ करा. सलमान खान माझा भाऊ आहे. त्याच्या वतीने मी माफी मागते. प्लीज माझ्या भावावर वाईट नजर ठेवू नये. प्लीज त्याला माफ करा. तो गरीबांचा अन्नदाता आहे. त्याला माफ करा." असं राखीने सांगितलं आहे. राखीने मीडियासमोर उठा-बश्या काढत बिश्नोई गँगची माफी मागितली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांची हत्या झाल्यानंतर सोशल मीडियावर एक संदेश व्हायरल झाला होता. ज्यामध्ये अभिनेता सलमान खानसोबत जो कोणी असेल त्याने सावध राहा असा तो संदेश होता. ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

'हम साथ साथ है' या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान सलमानने काळवीट या प्राण्याची शिकार केल्याचं सागितलं जात आहे. तेव्हापासून सलमान खान हा अडचणीत आहे. काळवीट बिश्नोई समाजासाठी पवित्र मानला जातो. या घटनेनंतर बिष्णोई समाजाने तीव्र संताप व्यक्त केला होता. बिष्णोई समाजाने सलमानविरोधात आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच तेव्हापासून बिष्णोई समाजाकडून सलमानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Breaking : हत्यांच्या घटनांनी अमरावती शहर हादरलं

Benefits of taking Steam: वाफ घेण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे का?

Maharashtra News Live Updates : महाविकास आघाडीचं मुंबईतील जागावाटप 90% पूर्ण, तीन जागांचा तिढा उद्यापर्यंत सोडवला जाणार

Maharashtra Assembly Election : निवडणूक जाहीर होताच महायुतीला सर्वात मोठा धक्का! राज्यात जुन्या मित्रपक्षाने सोडली साथ; VIDEO

Maharashtra Politics : विधानसभा निवडणूक जाहीर होताच महायुतीत मिठाचा खडा? अमित शहांच्या वक्तव्यानंतर शिंदे गट आक्रमक, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT