Amitabh- Jaya 50th Wedding Anniversary
Amitabh- Jaya 50th Wedding Anniversary Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amitabh- Jaya Wedding Anniversary: एक अट अन् अमिताभ- जया यांचं लग्न, ‘मला अशी बायको हवी जी...’ सांगितली बिग बींनी अट...

Chetan Bodke

Amitabh- Jaya Successfully Love Story: आज अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस. ही एव्हरग्रीन जोडी गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ३ जून १९७३ रोजी ही एव्हरग्रीन जोडी लग्नबंधात अडकली. अमिताभ आणि जया यांचे एकाच नजरेत एकमेकांवर प्रेम झाले होते. ‘गुड्डी’ चित्रपटाच्या सेटवरच यांची मैत्री झाली होती. तेव्हापासून त्यांची खूप चांगली मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले. 'जंजीर' चित्रपटाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, पण लग्नापूर्वी अमिताभ यांनी जया यांच्यासमोर एक अट ठेवली होती.

नात नव्या नवेली नंदा हिच्या पॉडकास्टमध्ये जया बच्चन यांनी त्या अटीबद्दल खुलासा केला होता. जया बच्चन पॉडकास्टमध्ये म्हणतात, लग्नानंतरही अमिताभ यांनी सतत काम करावे असे त्यांना वाटत नव्हते. जेव्हा नव्याने जया यांना त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल विचारले, तेव्हा जया बच्चन म्हणतात, “आम्ही ठरवले की ऑक्टोबरमध्ये आपण लग्न करू कारण तोपर्यंत माझे काम कमी होईल. तर अमिताभ मला म्हणतात, मला 9 ते 5 काम करणारी बायको नको आहे. काम कर. पण दररोज नाही. तु तुझे चित्रपट निवड आणि कोणासोबत काम करायचे आहे, याचा विचार कर.”

जया आणि अमिताभ बच्चन यांचे लग्न जया यांच्या मुंबईतील घरी साध्या पद्धतीने झाले होते. लग्नानंतर अमिताभ बच्चन आपल्या शूटिंगच्या कामात व्यस्त होते. बिग बींनी लग्नानंतर कामपाहून जया यांच्याकडेही लक्ष दिले. तर लग्नानंतर जया बच्चन यांनी करिअरशिवाय कुटुंबाला सुद्धा प्राधान्य दिले. 2014 मध्ये इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये अमिताभ बच्चन म्हणाले होते, “जयाची एक गोष्ट मला खूपच आवडते. तिने आपल्या कामाऐवजी घराला सर्वाधिक प्राधान्य दिल्यामुळे मला तिची ती गोष्ट फार आवडते. आम्ही दोघांनीही आपाआपल्या बाजूने कधीच आडकाठी केली नाही. लग्नानंतर सर्वच बायका निर्णय घेतात. त्याप्रमाणे जयानेही घेतले.” (Bollywood Film)

जया बच्चन यांनी पॉडकास्टमध्ये आपल्या लव्हस्टोरी बद्दल सांगितले की, आम्ही दोघेही एकत्र ‘जंजीर’ चित्रपटाच्या यशानंतर फिरायला जाणार होतो, पण एका दिवशी मला अमिताभने फोन केला आणि त्याची अडचण सांगितली. तो म्हणतो, माझे आई- वडिल आपल्याला एकत्र सहलीला जाऊन देणार नाहीत. जर आपल्याला जायचं असेल तर, आपल्याला दोघांनाही लग्न करावं लागेल. (Bollywood Actor)

म्हणून मी म्हणाले की आपण आधी ऑक्टोबर महिन्यात लग्न करण्याचे ठरवले होते, पण आपण जून महिन्यातच लग्न करूया. लग्न करण्याआधी तुला माझ्या आई-वडिलांसोबत बोलून घ्यावे लागेल. त्यांनी माझ्या वडिलांना फोन केला, त्यावेळी माझे वडिल फारसे आनंदी नव्हते. कारण त्यांना माझं लग्न होऊ नये, अशी त्यांची इच्छा होती. वडिलांनी लग्नासाठी होकार देताच आम्ही लग्नाचे विधी अगदी साध्या सोप्या पद्धतीने पार पाडले. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report | ..तर पक्ष फुटला असता! शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Csk vs Rcb: आरसीबीचं सेलिब्रेशन माहीला पाहावे ना? हस्तांदोलन न करताच परतला धोनी

INDIA आघाडी 300 जागा जिंकलीय, पाचव्या टप्प्याच्या मतदानाआधीच तेजस्वी यादव यांचा मोठा दावा

Today's Marathi News Live: पुण्यात बर्निंग बसचा थरार; आगीमुळे मोठी वाहतूक कोंडी

Eknath Shinde News |मुख्यमंत्र्यांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद!

SCROLL FOR NEXT