Husband Killed Wife Saam Tv
क्राईम

West Bengal Crime News: भयंकर! पत्नीला संपवलं, नंतर मृतदेहाचे ६ तुकडे करून नाल्यात फेकले; क्रूरकृत्यामागील विचित्र कारण आलं समोर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Husband Killed Wife In Kolkata

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहे. पश्चिम बंगालमध्ये देखील अशीच एक भयानक घटना समोर आलीय. जी वाचल्यानंतर पायाखालची जमिन सरकते. अतिशय धक्कादायक अशी हत्या झाल्याची घटना घडली आहे. पतीनेच पत्नीची हत्या (Husband Killed Wife) केला आहे. (latest marathi news)

जमिनीच्या वादातून पत्नीची हत्या

दिल्लीतील श्रद्धा वालकर खून प्रकरणासारखी धक्कादायक घटना पश्चिम बंगालमध्ये समोर आलीय. कोलकात्यामध्ये एका पतीने जमिनीच्या कारणावरून पत्नीची हत्या (Husband Killed Wife) केली. नंतर तिच्या मृतदेहाचे सहा तुकडे केले. पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपीनी मृतदेहाचे तुकडे कालव्यात फेकून दिले आणि नंतर स्वतः पोलिस ठाणे गाठलं.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मृतदेहाचे सहा तुकडे केले

ही घटना उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मध्यग्राममध्ये (West Bengal Crime) घडली. 55 वर्षीय बांधकाम साहित्य पुरवठादार नूरुद्दीन मंडल याने जमिनीसाठी पत्नी सायरा बानो (50) ची हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याने मृतदेहाचे सहा तुकडे केले. नंतर ते एका पोत्यात भरून कालव्यात फेकले. त्याच्या विवाहित मुलीने ही घटना उघड केली. तिला तिच्या आईच्या मोबाईलवर रक्ताचे डाग दिसले होते. आईचा खून झालाय, हे आपल्या मुलीला समजलं आहे. याची भनक लागताच आरोपीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

पोलिसांनी आरोपीला अटक केली

रुग्णालयात दाखल असलेल्या आरोपीची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि कालव्यातून मृतदेहाचे तुकडेही जप्त केले. आरोपी नूरुद्दीन मंडल याने मध्यग्राम पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल केला होता, अशी माहिती देखील पोलिसांनी (marathi crime news) दिलीय. त्यावेळी त्याच्या या वक्तव्यावर पोलिसांना संशय आला होता. हे प्रकरण वाढल्यावर तिच्या मुलीने आईच्या अपहरणाची तक्रार दाखल केली.

आरोपीने पत्नीचा गळा कापला

बारासतचे एसपी भास्कर मुखर्जी यांनी सांगितले की, आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिलीय. त्याने अगोदर पत्नीचा गळा कापला आणि नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. ही हत्या जमिनीच्या वादातून झाली असल्याचा दावा पोलिसांनी केलाय. या प्रकरणात मुलगी मणीबीबीने सांगितलं की, मध्यमग्राममधील श्रीनगर, आईच्या नावावर काही जमीन आणि घर आहे. तिच्या वडिलांची नजर त्या जमिनीवर होती. त्यासाठी ते नेहमी आईवर दबाव आणत असत, पण आईने जमीन देण्यास नकार दिला. याची किंमत तिला जीव देऊन चुकवावी लागली. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT