Telecom Service Rule Google
बिझनेस

Telecom Services Rule: तुमचा कॉल किंवा इंटनेट सेवा बंद झाली तर तुम्हाला मिळू शकते नुकसान भरपाई; काय आहे नवा नियम?

Siddhi Hande

मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे.आता मोबाईल सर्व्हिस बंद केल्यानंतर कंपनीला मोठी नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) लवकरच मोबाईल सर्व्हिसबाबत नवीन नियम लागू करणार आहे. TRAI ने जारी केलेल्या नियमांनुसार, टेलिकॉम ऑपरेटर्संना जिल्हा स्तरावर २४ तासांपेक्षा जास्त वेळ सेवा बंद झाल्यास ग्राहकांना भरपाई द्यावी लागणार आहे.

TRAI च्या नवीन नियमांनुसार, जर टेलिकॉम कंपनी आपले क्वालिटी बेंचमार्क पूर्ण करण्यास यशस्वी ठरली तर त्यांना दंड भरावा लागणार आहे. हा दंड ५०,००० रुपयांवरुन १ लाख रुपये करणार आहे. सहा महिन्यांनंतर हे नवीन नियम लागू केले जाणार आहेत.

रेगुलेटर ने रिवाइज्ड रेग्युलेशन- द स्टँडर्ड ऑफ क्वालिटी ऑफ सर्व्हिस ऑफ अॅक्सेस अँड ब्रॉडबँड सर्विस रेगुलेशन, २०२४ अंतर्गत तुम्ही या नियमांचे पालन न केल्यास तुम्हाला ५ ते १० लाख रुपये दंड भरावा लागेल.

नवीन नियम मुलभूत आणि सेल्युलर मोबाइल सेवा, ब्रॉडबँड सेवा आणि ब्रॉडबँड वायरलेस सेवांसाठी हे नवीन नियम लागू करण्यात आले आहे. एखाद्या जिल्ह्यात नेटवर्क आउटेज झाल्यास, टेलिकॉम ऑपरेटर्संना ग्राहकांच्या भाड्यात सवलत द्यावी लागणार आहे. नवीन नियमांनुसार, टेलिकॉम ऑपरेटर्संना प्रीपेड ग्राहकांसाठी वैधता वाढवावी लागेल.

हा नियम ब्रॉडबँड सर्व्हिस प्रोवाइडर्ससाठीदेखील लागू होणार

फिक्स्ड लाइन सर्व्हिस प्रोवाइडर्संना पोस्टपेड आणि प्रीपेड ग्राहकांनादेखील दंड भरावा लागणार आहे. या दंडाची रक्कम त्यांना ग्राहकांना द्यावी लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT