ITR Filling Last Date Saam tv
बिझनेस

ITR Filling Last Date: इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख माहितीये का? मुदतीत भरला नाही तर भरावा लागेल दंड

ITR Filling Last Date: देशातील सर्व कर्मचाऱ्यांना आयटीआर भरायचा असतो. आयटीआर न भरल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.आयटीआर भरण्याची शेवटची तारीख कधी आहे ते जाणून घ्या.

Siddhi Hande

प्रत्येक कर्मचाऱ्याने आयटीआर भरायचा असतो. आयकर रिटर्न करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे. जर तुम्ही ३१ जुलैपर्यंत आयकर रिटर्न फाइल केले नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल. वेळेत आयटीआर फाइल केल्याने अनेक फायदे होतात. जर तुमची टॅक्सेबल इन्कम असेल तर तुम्हाला वेळेवर रिवाइज रिटर्न फाइल करण्याची संधी मिळते. याचसोबत तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दंड लागू होणार नाही. जर तुम्ही अंतिम मुदतीच्या आधी आयटीआर भरला नाही तर इन्कम टॅक्स सेक्शन 234A अंतर्गत इंटरेस्ट आणि सेक्शन 234F अंतर्गत दंड भरावा लागेल.

आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे. १ एप्रिलपासून आयटीआर फाइल करण्यास सुरुवात झाली आहेत. तुम्हीही वेळेत आयटीआर फाइल करावा. जर तुम्ही वेळेत आयटीआर फाइल केला नाही तर तुम्हाला १ हजार ते ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. तसेच टॅक्सेबल इन्कम ५ लाख असेल तर त्यावर तुम्हाला ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. तर १ लाखाच्या किमतीवर १ हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

जर तुम्ही वैयक्तिक इन्कम टॅक्स फाइल करत असाल तर त्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे. तर कॉर्पोरेट आणि इतर लोकांना ऑडिटिंग करावी लागते. या लोकांसाठी आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी; भाजपमध्ये मोठा फेरबदल; अनेक नेत्यांची होणार उचलबांगडी, राजकीय उलथापालथ होण्यामागे कारण काय?

Maharashtra News Live Update: कराड शहर पोलिसांची मोठी कारवाई, 95.78 ग्रॅम एमडी ड्रग जप्त

Veen Doghatli hi Tutena: 'वीण दोघातली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट! चिंगीच्या गरोदरपणाचं सत्य समोर; स्वानंदी मोडणार अंशुमनचं लग्न?

विषारी दारू प्रकरणात मृतांच्या कुटुंबांना ५ लाखांची मदत; फडणवीस सरकारची घोषणा

मुंबईत ८२ इमारती अतिधोकादायक; २७३६ रहिवाशांचे जीव धोक्यात

SCROLL FOR NEXT