PM Kisan Mandhan Yojana Saam Tv
बिझनेस

PM kisan Mandhan Yojana: खुशखबर!शेतकऱ्यांना दर महिन्याला मिळतेय ३००० रुपये पेन्शन; पीएम किसान मानधन योजना आहे तरी काय?

PM kisan Mandhan Yojana: पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर महिन्याला ३००० रुपयांची पेन्शन दिली जाते. ही योजना नक्की आहे तरी काय ते जाणून घ्या.

Siddhi Hande

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये दिले जातात. या योजनेसोबत इतरही अनेक योजनांमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. त्यातील एक योजना म्हणजे पीएम किसान मानधन योजना.

पीएम किसान मानधन योजना हीदेखील शेतकऱ्यांसाठीच राबवण्यात आली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दर महिन्याला पेन्शन दिली जाते. वयाच्या ६० वर्षानंतर त्याला पेन्शन दिली जाते. म्हणजेच शेतकऱ्याचे पुढचे भविष्य आर्थिकदृष्ट्या खूप सुरक्षित जाईल.

पीएम किसान मानधन योजना नक्की आहे तरी काय?

पीएम किसान मानधन योजनेतही शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. फक्त ही मदत वयाच्या ६० वर्षानंतर दिली जाते. या योजनेसाठी असलेले लाभार्थी रजिस्टर असणे गरजेचे आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर महिन्याला ३००० रुपयांची पेन्शन मिळते. म्हणजेच वर्षाला ३६ हजार रुपयांची पेन्शन मिळते. ही पेन्शन तुम्हाला आयुष्यभर मिळणार आहे.

पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार पूर्वीपासून गुंतवणूक करावी लागेल. तुम्हाला दर महिन्याला ५५ रुपये ते २०० रुपये गुंतवावे लागणार आहे. जेवढे जास्त पैसे तुम्ही गुंतवाल तेवढे जास्त पैसे तुम्हाला मिळणार आहेत. या योजनेतील लाभार्थ्यांचे पैसे हे पीएम किसान सन्मान निधी योजनेमधूनदेखील कापले जातात. त्यामुळे तुमचे वेगळे असे पैसे जाणार नाहीत.या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT