E-Shram Card Saam Tv
बिझनेस

E-Shram Card: असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना सरकार देतंय ३,००० रुपयांची पेन्शन; ई-श्रम कार्ड योजना नेमकी आहे तरी काय?

E-Shram Card Scheme For Labours: सरकारची असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी खास योजना आहे. या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना पेन्शन मिळते.

Siddhi Hande

सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांमध्ये नागरिकांना आर्थिक मदत मिळते. त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने योजना राबवली जाते. कोणत्याही कंपनीत काम करणाऱ्या लोकांना पेन्शनचे पैसे मिळतात. परंतु असंघटित क्षेत्रातील लोकांना पेन्शन मिळत नाही. याच लोकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकारने ई-श्रम योजना राबवली आहे. (E-Shram Card)

ई-श्रम योजनेअंतर्गत कामगारांना प्रत्येक महिन्याला ठरावीक रक्कम दिली जाते. त्यांचे भविष्य आर्थिकदृष्टया सुरक्षित व्हावे, या उद्देशाने ही योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना ६० वर्षांनंतर पेन्शन दिली जाते.

ई- श्रम कार्डद्वारे ३० व्यापक व्यवसाय आणि ४०० व्यवसायाअंतर्गत नोंदणी झालेल्या कामगारांना मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना ३००० रुपयांची पेन्शन मिळते. या योजनाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना ई-श्रम कार्ड बनवून घ्यावे लागेल. (E-Shram Card Scheme)

सरकारने २०२१ मध्ये ही योजना सुरु केली होती. या योजनेत आतापर्यंत २९.२३ कोटी कामगारांनी अर्ज केला आहे. या योजनेत कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास २ लाख रुपये दिले जातात. तर अपंगत्व आल्यास १ लाख रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत तु्म्ही ई-श्रमच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GT vs MI: अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला; तिलक आणि अश्विनीनं गुजरातचा धुव्वा उडवला

IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

अमेरिका-इराण युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकेच्या कुरापतीमुळे इराणचा संताप

SCROLL FOR NEXT