हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही बातमी खूप महत्त्वाची आहे. पीक विम्यासाठी नोंदणी करण्यासाठी कृषी विभागाने नवीन पोर्टल सुरू केले आहे. मृगबहर २०२५ च्या हंगामासाठी संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, चिकू, लिंबू, सीताफळ आणि द्राक्ष या फळबागांच्या विमा संरक्षणासाठी नोंदणी प्रक्रिया सध्या सुरू झालीय.
यापैकी चार प्रमुख पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० जून २०२५ आहे. तर इतर पिकांसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत १४ आणि ३१ जुलै या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.
संत्रा, पेरू, लिंबू, द्राक्ष – ३० जून २०२५
मोसंबी, चिकू – 3३० जून २०२५
डाळिंब – १४ जुलै २०२५
सीताफळ – ३१ जुलै २०२५
कृषी विभागाचे अधिकृत पोर्टल – https://pmfby.gov.in/farmerLogin – शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-पिक पाहणी आणि AgriStack योजनेतील शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्यात आलेत.
आधार कार्ड
बँक पासबुक
7/12 उतारा (जमीन धारणा दाखला)
ई-पिक पाहणीसह Geo-tagged फोटो
AgriStack अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक
तसेच ई-पिक पाहणी नोंद नसल्यास विमा अर्ज फेटाळला जाऊ शकतो.
या योजनेचा उद्देश हवामान बदलांमुळे फळपिकांवर होणाऱ्या विपरीत परिणामांपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणे हा आहे. जर कमी पाऊस किंवा खंडित पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले. अधिक पाऊस किंवा आर्द्रतेमुळे झाडांचे नुकसान झाले तर या परिस्थितीत शेतकऱ्यांना विमा योजनेतून भरपाई दिली जाते.
शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत भाग घेतल्यानंतरही जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करता येते. मात्र विमा अर्जासाठी प्राथमिक टप्प्यात काही कागदपत्रे अनिवार्य असतात. असून, त्यात कोणतीही त्रुटी असल्यास अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.