Devendra Fadnavis Saam Tv
बिझनेस

CM Fadnavis: ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा अर्थसंकल्प: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CM Fadnavis Comment On Budget: केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. तसेच यातून ग्रामीण भारत कसा बदलणार तेही सांगितलंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देशातील मध्यमवर्गासाठी स्वप्नवत अर्थसंकल्प आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आणि १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करुन एक मोठा दिलासा मध्यमवर्गाला दिला. ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा आणि नागरिककेंद्रीत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने नेणारा आहे. हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला अधिक प्रगल्भ करणारा ठरेल. अर्थव्यवस्थेला आणखी सदृढ करणारा, मध्यमवर्गीय, पगारदार, युवा आणि शेतकरी, कष्टकरी या सगळ्यांना दिलासा देणारा आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे महाराष्ट्र हे स्टार्टअपचे कॅपिटल असल्याने नवीन धोरणांचा मोठा लाभ मिळेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आयकरची मर्यादा वाढविल्यामुळे तो पैसा अर्थव्यवस्थेत येईल आणि त्यामुळे मागणी वाढेल. कराची मर्यादा ७ वरून १२ लाख करणे हा निर्णय ऐतिहासिक असल्याचंही फडणवीस म्हणालेत. कराची मर्यादा वाढवण्यात आल्याने मध्यमवर्गीय, पगारदार, युवक यांना मोठा दिलासा मिळणार आहे. एका मोठ्या वर्गाच्या हाती उत्पन्नाचा मोठा वाटा राहणार आहे. ज्यामुळे बाजारपेठांत चैतन्य निर्माण होईल.

या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठींही महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. देशातील 100 जिल्ह्यांसाठी विशेष प्रोत्साहन योजना, तेलबिया उत्पादनाला प्रोत्साहन, यात शंभर टक्के माल खरेदीचे धोरण यामुळे शेतकर्‍यांसाठी एक मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. मच्छिमारांना आता 5 लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी मिळणार आहे. यातून त्यांना व्यवसायवाढीसाठी प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा आहे. कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढेल, अशा निर्णंयामुळे शेती आणि शेतकर्‍यांसाठी नव्या संधी निर्माण होणार आहेत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

युवा उद्योजकांसाठी एमएसएमई क्षेत्र महत्वाचे आहे. त्यांच्यासाठी कर्ज मर्यादा आणि वारंवारतेचा निकष वाढविण्याच्या निर्णय महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्र ही स्टार्टअपची राजधानी आहे. स्टार्टअपसाठी 20 कोटी रूपयांची कर्ज मर्यादा करण्यात आलीय. रोजगार वाढल्याने राज्याची या क्षेत्रातील वाटचाल आणखी दमदार होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूर विधानपरिषदेच्या जागेसाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच

RCB vs GT IPL 2026 Final: गुजरातची फलंदाजी ढेपाळली, वॉशिंग्टन सुंदरला मिळालं जीवनदान

Chanakya Niti : बायकोच्या या 5 गोष्टी डोळे झाकून मान्य करणं ठरेल धोकादायक, चाणक्यांचा महत्वाचा सल्ला

विधानपरिषद निवडणुकीत मोठं काहीतरी घडणार? एकनाथ शिंदेंच्या बैठकीत ट्विस्ट, नेत्यांना दिल्या महत्वाचा सूचना|VIDEO

Panvel Tourism : अवघ्या १० मिनिटांचा ट्रेक अन् दिसेल शहराचा सुरेख नजारा, पनवेलजवळील 'हे' ऑफबीट ठिकाण नक्की पाहा

SCROLL FOR NEXT