Ayushman Bharat Scheme  Saam Tv
बिझनेस

Ayushman Bharat Scheme: आयुष्मान भारत योजना काय आहे? कार्ड असून लाभ घेता येत नाही? कशी कराल तक्रार

PM Jan Arogya Yojana : आयुष्मान भारत योजना किंवा प्रधान मंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना होय

कोमल दामुद्रे

आयुष्मान भारत योजना (Government Scheme) :

केंद्र सरकारमार्फत नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. त्यातील एक आयुष्मान भारत योजना किंवा प्रधान मंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना होय. यामार्फत अनेक नागरिकांना मोफत उपचाराची सुविधा मिळते.

ही योजना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ साली सुरु करण्यात आली होती. या योजनेतून अनेक गरीब आणि गरजू लोकांना आरोग्य विमा उपलब्ध केली जाते. केंद्र सरकारच्या या योजनेतून १० कोटीपेक्षा अधिक लोकांनी लाभ घेतला आहे. तसेच ज्या लोकांकडे आयुष्मान भारत योजनेचे कार्ड आहे त्यांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतो.

1. सुविधा कशी मिळेल?

  • जर तुमच्याकडे आयुष्मान भारत योजनेंतर्गत कार्ड असेल तर भारतातील (India) कोणत्याही रुग्णालयात मोफत उपचार मिळू शकतो.

  • जर तुम्ही आयुष्मान भारत योजना कार्डधारक असाल आणि या योजनेत असणाऱ्या हॉस्पिटलने (Hospital) रुग्णावर उपचार करण्यास नकार दिला तर तुम्ही तातडीने रुग्णालयाविरुद्ध तक्रार दाखल करु शकता.

  • तक्रार दाखल केल्यानंतर शासनाकडून रुग्णालयावर योग्य ती कारवाई केली जाते.

2. आपण तक्रार कधी करू शकत नाही?

तक्रार (Complaint) केवळ एका अटीवर केली जाते शकते, ती म्हणजे रूग्णालयात रुग्णावर विशिष्ट उपचार असायला हवेत. रूग्णाच्या उपचारासाठी रूग्णालयात विशिष्ट उपचार सुविधा उपलब्ध नसल्यास, आपण तक्रार नोंदवू शकत नाही.

3. आपण तक्रार कशी आणि कुठे करू शकता?

  • आयुष्मान भारत योजना कार्डधारक आपली तक्रार राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक 14555 वर नोंदवू शकतात.

  • आयुष्मान भारत योजनेंतर्गत, विविध राज्यांसाठी तक्रारी नोंदवण्यासाठी टोल-फ्री क्रमांक उपलब्ध आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT