बातम्या

वाचा | आता चीनच्या भूमीत जाऊन भारत करणार चर्चा

साम टीव्ही न्यूज

भारत आणि चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला आहे. मागच्या सोमवारी गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर चीनची मुजोरी समोर आली होती. या संघर्षात चीनचीही मोठी जिवीतहानी झाली होती. तसेच भारतातही चीनविरोधी लाट उसळली होती. आता दोन्ही देशांमध्ये सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी कमांडर पातळीवर चर्चा करण्यात येणार आहे.

भारतीय लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्यानं एएनआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे. त्यात म्हटलंय की, “भारत आणि चीनमध्ये आता कमांडर पातळीवर चर्चा केली जाणार आहे. ही बैठक प्रत्यक्ष ताबारेषेच्या पलिकडे चीनच्या भूमीत मोल्डो येथे होणार आहे. त्यात लडाखमधील संघर्षाबद्दल चर्चा केली जाणार आहे.”

भारत आता चीनच्या भूमीत जाऊन करणार चर्चा; भारतीय लष्करानंच दिली माहिती
आठवडाभरापूर्वी उडालेल्या संघर्षानंतर भारत आणि चीनमध्ये आता चर्चा होणार आहे. भारतीय लष्करानंच यासंबंधी माहिती दिल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. विशेष म्हणजे ही चर्चा सीमापार चीनच्या भूमीत होणार आहे.

WebTittle ::Read | Now India will go to China and discuss

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salary Hike 2024 : यंदा नोकरदारांच्या पगारात होणार भरघोस वाढ! किती वाढणार तुमची सॅलरी?

Kalyan Murbad Railway Line: कल्याण मुरबाड रेल्वेच्या भूसंपादनाला शेतक-यांचा विरोध, पाेलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदाेलन शमले

Herbal Tea पिणं आरोग्यासाठी लाभदायी

Accident News: भरधाव पिकअप अनियंत्रित होऊन टेम्पोला धडकला; भीषण अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू, थरारक VIDEO

Tulsi Vastu Tips: सकाळी तुळशीला पाणी घालण्याची योग्य वेळ काय?

SCROLL FOR NEXT