बातम्या

ओला-उबरमुळे मंदी अर्थमंत्री सीतारामन यांच अजब वक्तव्य 

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : लाखो लोक ओला-उबरसारखी ऍप बेस्ड टॅक्‍सी सेवा वापरतात, त्याचा फटका ऑटोमोबाइल उद्योगाला बसला आहे, असे विधान केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी आज केले. ऑटोमोबाइल क्षेत्रात सध्या मंदीचे वातावरण असून, काही कंपन्यांनी उत्पादन थांबवले आहे. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी ऑटोमोबाइल क्षेत्रातील मंदी ही लोकांच्या मानसिकतेत झालेल्या बदलामुळे आणि बीएस-मुळे आली असल्याचे सांगितले. 

पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, "वाहन क्षेत्रातील घसरणीसाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. बीएस-च्या निकषांपासून वाहन नोंदणी शुल्क आणि लोकांची मानसिकता आदी घटकांचा त्यात समावेश आहे. हल्लीच्या काळात कर्ज काढून गाडी घेण्यापेक्षा अनेक जण मेट्रो अथवा ओला-उबरसारख्या कॅबमधून प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत.'' 

ऑटोमोबाइल क्षेत्रात होणारी आर्थिक घसरण गंभीर समस्या असल्याचेही सीतारमन यांनी मान्य केले. "आम्ही सर्वच क्षेत्रांतील समस्यांबाबत गंभीर असल्याचेही त्यांनी सांगितले. या समस्यांचे निराकरण होण्यासाठी सरकार आवश्‍यक पावले उचलणार असून, हे सरकार सर्वांचेच ऐकते. आवश्‍यकता भासल्यास आणखी काही घोषणा केल्या जातील,'' असेही सीतारमन यांनी स्पष्ट केले. 

याआधी "मारुती"चे अध्यक्ष भार्गव यांनी ओला-उबरसारख्या सेवांमुळे मोटारींचा विक्री घटली असल्याचा दावा खोडून काढला होता. मोटारींची विक्री घटण्यामागे सरकारचे धोरणही कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले होते. पेट्रोल-डिझेलवर असलेले भरमसाट कर, अतिरिक्त रस्ते कर आदींमुळेही मोटार खरेदीकडे कल नसल्याचे त्यांनी म्हटले होते. 

Web Title: Millennials Prefer Ola, Uber To New Cars: Finance Minister On Auto Crisis
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live:कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याने घेतला चौदा जणांचा चावा; जखमीमध्ये 8 लहान मुलांचा समावेश

CSK Vs SRH : ऋतुराज गायकवाडची तुफानी फटकेबाजी, शतक अवघ्या २ धावांनी हुकलं; हैदराबादसमोर २१३ धावांचं लक्ष्य

Maharashtra Politics: मोदी आणि शाह यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

Gujrat Fire News | गुजरातच्या बाजारात भीषण आग, नाडियाद परिसरात वाहनं जळाली

Rahul Gandhi: भाजप हा 'आरक्षण रद्द करा' टोळीचा अड्डा आणि मोदी त्यांचे नेते, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT