बातम्या

विश्वकरंडकातील भारत पाकिस्तान सामना रद्द, बीसीसीआयचा मोठा निर्णय

सकाळ न्यूज नेटवर्क

वर्ल्डकप 2019 : मुंबई : जून महिन्यात होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्याबाबत बीसीसीसआयने आज मोठा निर्णय घेतला. विश्वकरंडकात भारत पाकिस्तानविरुद्ध खेळणार नसल्याचे बीसीसीआयने आज जाहीर केले. काश्मिरमधील पुलावामा येथे झालेल्या दहशतबादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

बीसीसीआयने यापूर्वीच दहशतवादाशी संबधित असणाऱ्या देशांबरोबर आयसीसीने संबध तोडावेत अशी मागणी केली आहे. ''आम्ही चर्चा करुन हा निर्णय घेतला आहे. आम्ही नेहमी देशालाच प्राधान्य देऊ. अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानशी खेळणे म्हणजे देशवासियांना अनादर करण्यासारखे आहे,'' असे मत प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद यांनी व्यक्त केले. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वकरडंकात 16 जूनला सामना होणार आहे. काही दिवसांपूर्वी या दोन्ही देशांमधील सामना होईल असे वाटत होते मात्र, आता बीसीसीआयने खूप मोठे पाऊल उचलले आहे. 

''आम्ही सर्व परिस्थितीचा विचार करुन पाकिस्तान न खेळणेच देशासाठी सर्वात योग्य आहे असा निर्णय घेतला आहे. आम्ही आयसीसीला यापूर्वीच दहशवाद्यांना पोसणाऱ्या देशांवर कारवाई करण्यास सांगितले आहे मात्र, त्यांनी या विषयात न पडण्याचे ठरविले आहे. म्हणूनच आम्ही आमा निर्णय घेण्याचे ठरविले आहे,'' असेही राय यांनी स्पष्ट केले.

Web Title: BCCI confirms that India will not Play against Pakistan in World Cup 2019

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: चेहऱ्यावर साबण लावताय?होऊ शकतात या गंभीर समस्या

Ananya Panday : क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो

400cc चे पॉवरफुल इंजिन, स्टाईश लूक; Bajaj Pulsar NS400 पुढील आठवड्यात होणार लॉन्च

Today's Marathi News Live: नरेंद्र मोदींनी 60 कोटी तरुणांना मुद्रा लोन दिलं; देवेंद्र फडणवीस

Madha Loksabha Election: देवेंद्र फडणवीस यांची आणखी एक खेळी, धवलसिंह मोहिते पाटील यांचा महायुतीला पाठिंबा

SCROLL FOR NEXT