बातम्या

15 ऑक्टोबरपासून केंद्र सरकारची सुवर्ण रोखे योजनेला होणार सुरवात

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली: केंद्र सरकारची सुवर्ण रोखे योजना चालू महिन्यात 15 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. नागरिकांना पुढीलवर्षाच्या म्हणजेच फेब्रुवारी 2019पर्यंत पाच टप्प्यांत सुवर्ण रोख्यांमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. 

केंद्र सरकार हे सुवर्ण रोखे बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, काही ठराविक टपाल कार्यालयांमध्ये किंवा शेअर बाजारातून विकत घेता येणार आहेत. सुवर्ण रोख्यांचे टप्पे पुढीलप्रमाणे असतील. 

पहिला टप्पा    15 ते 19 ऑक्टोबर    
दुसरा टप्पा       5 ते 19 नोव्हेंबर
तिसरा टप्पा      24 ते 28 डिसेंबर
चौथा टप्पा      14 ते 18 जानेवारी
पाचवा टप्पा      4 ते 8 फेब्रुवारी

सोन्याची आयात कमी करण्यासाठी सरकारने सुवर्ण रोखे बाजारात आणले आहेत. नोव्हेंबर 2015 पासून या योजनेस सुरुवात करण्यात आली.  सुवर्ण रोख्यांच्या माध्यमातून एका व्यक्तीला आर्थिक वर्षात जास्तीत जास्त चार किलो सोने घेता येते. तर, विश्वस्त संस्थांना एका वर्षात 20 किलो सोने घेता येणार आहे. 


Web Title: Sovereign Gold Bond scheme to open from October 15

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अवघ्या 27 व्या वर्षी कोट्यावधींची मालकीण आहे बॉलिवूडची अप्सरा Janhvi Kapoor

Health Tips: जिममध्ये व्यायाम करण्यापूर्वी तुम्हीही 'ही' चूक करत नाही ना?

Devendra Fadnavis: महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला, देवेंद्र फडणवीस यांची माहिती; नाशिक-ठाण्याची जागा मिळणार शिंदेंना?

Sonakshi Sinha: बोलके डोळे, केसात गजरा; सोनाक्षीच्या अदांवर खिळल्या नजरा!

Mumbai News: पालकांनो सावधान! मुंबईत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, डॉक्टरसह ७ जणांना अटक

SCROLL FOR NEXT