मुंब्रा बायपासचे काम सुरु असल्यामुळे राज्य सरकारने. मुलुंडचे दोन्ही टोललनाके तसंच ऐरोली टोलनाक्यावर 21 ऑगस्ट ते 23 सप्टेंबरपर्यंत. खासगी हलक्या वाहनांना टोलमाफी जाहीर करण्यात आलीय.
मुंब्रा बायपास या मार्गावरील वाहतूक मे महिन्यापासून पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे, या वाहतुकीचा ताण तीन महिन्यांपासून ऐरोली, शिळफाटा मार्गावर पडत आहे. मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीच्या कामामुळे ठाण्यात येणाऱ्या वाहनांना ऐरोली आणि मुलुंडहून फिरुन यावं लागतं.
मात्र, या रस्त्यावर दोन टोलनाके असून आधीच असलेली वाहतूक कोंडी आणि त्यात टोलसक्ती यामुळे वाहनचालक पुरते वैतागले होते. सरकारच्या निर्णयामुळं आता वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
WebTitle : marathi news no toll on mulund and and airoli toll posts for one month
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.