बातम्या

मुंबईकरांचा पावसाळा रामभरोसे; मुंबई तुंबली तर मनपा जबाबदार नाही

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबईकरांनो यंदाच्या पावसाळ्यात तुमचा परिसर तुंबला तर तुमची काळजी तुम्हीच घ्या, कारण मुंबई महापालिका तुमच्या मदतीला धावून येईल याची शाश्वती नाही. कारण महापौरांनी मुंबई तुंबली तर त्याला महापालिका जबाबदार नाही असं स्पष्टपणं सांगून टाकलंय. एमएमआरडीएच्या मेट्रोच्या कामामुळं पर्जन्यवाहिन्या तुटल्यात त्यामुळं मुंबई तुंबली तर आम्ही जबाबदार नाही असं त्यांनी सांगूनही टाकलंय.

पावसाळा पंधरा दिवसांवर आला असताना मुंबईतली नालेसफाई कासवगतीनं सुरू आहे. आतापर्यंत सरासरी पन्नास टक्के म्हणजे निम्मीच नालेसफाई झालीय. त्यामुळं मेट्रोची काम सुरू असलेला भाग वगळून इतर भागात पाणी तुंबणार नाही याचीही शाश्वती नाही. त्यामुळे मुंबईत यंदाच पाणी तुंबेल असंही नाही बरं का? गेल्या अनेक वर्षांपासून दर पावसाळ्यात एक दोन वेळा तरी मुंबई तुंबतेच. प्रत्येक वेळा खापर फोडण्यासाठी वेगवेगळं कारणं फोडलं जात. कधी 9 किलोमीटर लांबीच्या ढगावर... तर कधी मुंबईकरांवर... यंदा हे खापर फोडण्यासाठी एमएमआरडीचा माथा शोधण्यात आलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leg Pain: रात्री झोपताना पाय दुखतात? 'या' उपायांनी होईल फायदा

Sanjay Raut: महाविकास आघाडी राज्यात किती जागा जिंकणार? संजय राऊतांनी आकडाच सांगितला!

Pre-Wedding Shoot : उन्हाळ्यात प्री वेडिंग शूट करताना 'ही' काळजी घ्या

Tur Dal Rate Update: तुरडाळ महागली! जाणून घ्या नवे दर

Hardik Pandya Statement: मुंबईच्या पराभवाला हार्दिकने या खेळाडूला ठरवलं कारणीभूत! म्हणाला...

SCROLL FOR NEXT