ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीची दिवसभर दगदग होत असते.
या सर्वांचा परिणाम पाय दुखीवर होतो.
चला तर मग पाहुयात यावर काय उपाय करता येतील.
रात्री झोपण्याअगोदर गरम पाण्यात जाडे मीठ मिस्क करून त्यात पाय शेकल्याने पायदुखीपासून आराम मिळतो.
दररोज झोपण्यापूर्वी पायांची मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारते,त्यामुळेही पायदुखीपासून आराम मिळतो.
फिश ऑईलच्या साहाय्याने पायाची मालिश केल्यास फायदा होतो.
पायांना काही प्रमाणात गरम कपड्याने शेक दिल्यास पायदुखीपासून आराम मिळतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.