बातम्या

मुंबईत पावसामुळे विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्य

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबईला सकाळ पासूनच पावसाने अक्षरशा झोडपून काढले असून पावसामुळे विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्य झाला आहे तर दोघे जण अत्यवस्थ आहेत,त्यांच्यावर ट्रॉमा केअर रुग्णालयावर उपचार सुरू आहेत.

पहिली घटना अंधेरी पश्चिम येथील आरटीओ कार्यालयाजवळ घडली आहे. या परिसरात साचलेल्या पावसाच्या पाण्यातून काशिमा युडियार ही ६० वर्षीय महिला जात असताना तिला विजेचा शॉक लागला. या महिलेला नजीकच्या कूपर रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

दुसरी घटना ही गोरेगाव पूर्व मधील दुर्गा माता मंदिराजवळ घडली आहे. आज सकाळी या रिसरातून जात असताना चौघा जणांना विजेचा शॉक लागून ते जखमी झाले. जखमींना अग्निशमन दलाच्या जवानांनी ट्रॉमा सेंटर रुग्णालयात नेले असता यातील राजेंद्र यादव(वय ६०) आणि संजय यादव (वय २४)  यांना मृत घोषित करण्यात आले. 

दरम्यान, आशादेवी यादव (वय ५ ) आणि  दिपू यादव ( वय २४)  हे दोघे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

WebTitle : marathi news mumbai rains three died due to electricity shock 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : बारामतीत मडकं फोडणारा "तो" कार्यकर्ता कोण?

Special Report : तुम्हारे पास क्या है? कोल्हेंच्या डायलॉगबाजीने अहमदनगरात वातावरण तापलं

Mithila Palkar : ‘वेब क्वीन’ मिथिलाचा अनोखा साज, लूकने वेधले लक्ष

Nashik Lok Sabha: शांतीगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम, नाशिकमध्ये महायुतीला घाम! गोडसेंच्या अडचणी वाढणार?

Special Report : कुलरची थंड थंड हवा ठरतेय जिवघेणी! 7 वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT