'केंद्रात नरेंद्र मोदी सरकारच हवे आहे', असे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रसचेच कार्यकर्ते म्हणतात.. त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते असे म्हणत असतील, तर हे पक्ष जनतेसमोर जाऊन काय भूमिका मांडणार आहेत? सध्याची परिस्थिती काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससाठी अवघड दिसत आहे. त्याला कारणेही तशीच आहेत.
काँग्रेसची सध्याची सगळ्यांत मोठी चूक म्हणजे ज्या विषयांवर वाद टाळायला हवा होता, ते त्यावरच बोलतायत! म्हणजे, सर्जिकल स्ट्राईकचे सरकारकडे पुरावे मागणे किंवा 'कपाळावर गंध असलेल्यांची भीती वाटते', असे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे वक्तव्य वगैरे.. त्यातच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दहशतवादी मसूद अजहरचा उल्लेख 'अजहरजी' असा केला.
महाराष्ट्रात काँग्रेससमोर सर्वांत मोठे आव्हान आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे.. याशिवाय, पक्षातील बड्या नेत्यांची सुरू असलेली फोडाफोड हीदेखील त्यांच्यासाठी एक डोकेदुखीच आहे. वंचित बहुजन आघाडी आणि 'एमआयएम'ने प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्यानुसार सर्व 48 मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले, तर त्याचा 100 टक्के फायदा भाजप-शिवसेनेलाच होणार आहे. याचे कारण प्रत्येक मतदार संघामध्ये आंबेडकर यांना मानणारे किमान पन्नास-साठ हजार मतदार आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने कोणत्याही इतर विरोधी पक्षांशी आघाडी केली नाही, तर राज्यात भाजप-शिवसेनेचे चाळीसहून अधिक उमेदवार निवडून येतील, असेच चित्र आहे.
या सगळ्या घडामोडींविषयी तुम्हाला काय वाटते?
Web Title:Congress workers want Modi Government back in power writes Citizen Journalist Akshay Kaspate
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.