बातम्या

लोकसंख्या नियंत्रणासाठी बाबा रामदेव यांचा फंडा..

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : दोन आणि दोनपेक्षा अधिक मुले असलेल्या कुटुंबीयांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यात यावा, अशी मागणी योगगुरु रामदेवबाबा यांनी केली आहे.

रामदेवबाबांनी लोकसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. रामदेवबाबांनी दोन अपत्ये असलेल्यांना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ नाही दिला पाहिजे, तसेच सरकारी नोकरीतही सहभागी करून घेतले नाही पाहिजे अशी मागणी केली आहे.

रामदेवबाबा म्हणाले, ''लोकसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी दोन आणि त्यापेक्षा अधिक अपत्ये असलेल्यांना निवडणुकीत सहभागी होणे आणि सरकारी रुग्णालये व शाळांचा वापर नाही करू दिला पाहिजे. यामुळे आपोआप लोकसंख्या कमी होण्यास मदत होईल.''

यंदाच्या लोकसभेत कोणाचाही विजय किंवा पराभव होऊ शकतो. लोकसभेची निवडणूक जोरदार होणार असून, दोन्ही बाजूला दिग्गज असणार आहेत. राम मंदिराच्याबाबतीत जेवढ्या जोरात नागरिकांकडून आवाज उठविण्यात येत आहे, तेवढ्याच वेगाने सरकारने काम करणे गरजेचे आहे. हनुमान हा कोणत्या जातीचा आहे हे शास्त्रांमध्ये नसले तरी गुणांवरून तो ब्राह्मण असेल असे वाटते, असे रामदेवबाबांनी म्हटले आहे.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB Playoffs Scenario: 'इ साला कप नामदे..' RCB ला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी! करावं लागेल हे काम

Yogita Chavan: हुस्नपरी, बोल्डसुंदरी... अंतराच्या अदांचा जलवा!

Today's Marathi News Live : साखर कारखान्याचा १०००० कोटींचा आयकर माफ केला, देवेंद्र फडणवीस

Mumbra News : मुंब्रा परिसरात एनसीबीची मोठी कारवाई; आंतरराज्य अमली पदार्थ तस्करीला पर्दाफाश

Mumbai Jobs | मराठी माणसाविषयीची ती पोस्ट, कंपनीने मागितली माफी!

SCROLL FOR NEXT