बातम्या

अहमदनगरमध्ये झालेल्या हाणामारीत एक ठार 11 जण जखमी; 51 जणांविरोधात गुन्हा दाखल 

सकाळ न्यूज नेटवर्क

अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या कळस पिंपरी गावात गायरान जमिनीच्या वादातून दोन गटात मारामारी झालीय. यात एकाचा मृत्यू झालाय तर 11 जण जखमी झालेत. दरम्यान याप्रकरणी 51 जणांच्या विरोधात पाथर्डी तालुक्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पाथर्डी तालुक्यातील कळसपिंपरी गावात अनेक वर्षांपासुनची गायरान जमिन होती. या जमिनीत कंस पवार यांचे कुटंब शेती करत होते. मात्र या जमिनीत जलसंधारणाचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी पाथर्डी पोलिस ठाण्यात अर्ज दिला. तरीही कुठलिही कारवाई न झाल्याने जलसंधारणाचे काम करण्यासाठी ग्रामस्थांनी थेट गायरान जमिनीतच जेसीबी नेला. पिकवलली शेती उध्वस्त होऊ नये म्हणून पवार कुटुंबीयांनी ग्रामस्थांना विरोध केला. यावेळी दोन्ही गटात जबर हाणामारी होऊन तब्बल 11 जण जखमी झालेत.

जखमींपैकी कंस पवार हे गंबीर जखमी झाल्याने त्यांना अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. कंस पवार यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय. त्यामुळे आता आरोपींना अटक करुन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पवार कुटुंबीयांनी केलीये.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India T20 World Cup Squad : किंग कोहलीवर विश्वास कायम, पंत आणि चहलचंही कमबॅक; टी-20 वर्ल्डकप टीमबाबत ५ महत्वाचे मुद्दे

PM Narendra Modi आणि एपी ग्लोबालेचे संस्थापक अभिजीत पवार यांची नवी दिल्लीत भेट

Explainer : लोकल गर्दीमुळे आणखी किती रियांचे बळी जाणार? डोंबिवली - कोपरदरम्यानच घटना का घडताहेत?

MI Vs LSG : लखनौच्या गोलंदाजांसमोर मुंबईचा संघ गडगडला; लखनौसमोर १४५ धावांचं लक्ष्य

Modi VS Pawar | राजकारणातील भटकती आत्मा कोण? मोदी-पवारांमध्ये जुंपली

SCROLL FOR NEXT