Wardha News Saam tv
ऍग्रो वन

Wardha News : तुर बियाणांच्या दरात वाढ; प्रतिकिलो वाढले शंभर रुपये

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकरी मशागतीच्या कामाला लागला असून बियाणे खरेदीची लगबग सुरु झाली आहे. अश्यातच यंदा तुरीच्या बियाण्याच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता तुरीचे बियाणे खरेदी करताना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. 

खरीप हंगाम (Kharip Hangam) तोंडावर असल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे. शेतात यंदा काय काय लागवड करायची याचे नियोजन आखत असून त्यानुसार बियाणे खरेदी करत आहे. वर्धा जिल्ह्यात प्रामुख्याने कापूस, तुरीची लागवड केली जाते. मात्र यंदा तुरीच्या बियाणे किमतीत वाढ झाली आहे. यंदा बियाणात प्रतिकिलो मागे १०० रुपये किँमत वाढली आहे. अर्थात तुरीचे उत्पादन घेणाऱ्या (Farmer) शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. 

मागील वर्षी तुरीच्या उत्पादनात घट झाली असल्याने शेतकऱ्यांच्या घरीही बियाणे नाही. तुरीच्या बियाण्याच्या (Wardha) दरात किलोमागे शंभर रुपयाची वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. सरकारने बियाणे व रासायनिक खातंच्या दरावर नियंत्रण ठेवावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाने नक्षत्रामध्ये केला बदल; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Politics: हरियाणाची पुनरावृत्ती होणार, राज्यात महायुतीचे सरकार येणार: CM एकनाथ शिंदेंना विश्वास

Maharashtra Weather: पुढील ५ दिवस पावसाचे! 'या' जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD कडून यलो अलर्ट जारी; वाचा आजचे हवामान

Horoscope Today : धार्मिक कार्यावर पैसा खर्च होईल, मानसिक ताण जाणवेल; तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT