वर्धा : वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीकरिता दिवसा वीज पुरवठा करावा, वीज कापू नये या मागणीसाठी (NCP) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, माजी आमदार सुरेश देशमुख, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत आदी उपस्थित होते. (Tajya Batmya)
शासनाने काही जिल्ह्यात शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्याच ठरवले आहे. अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. वर्धा (Wardha) जिल्ह्यातही जंगल असून वन्य श्वापद आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातदेखील दिवसा वीज पुरवठा करावा, तसेच शेतीचे (Farmer) वीज कनेक्शन कापू नये अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली.
अधिवेशनात मुद्दा मांडणार
वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री हे उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री असून यातून जिल्ह्याला का वगळले, असा प्रश्न तनपुरे यांनी उपस्थित केला. याबाबत हिवाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित करणार असल्याचं तनपुरे म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.