सततचा पाऊस, पुराने कापूस पिकाला फटका: भाव पडण्याची भीती Saam Tv
ऍग्रो वन

सततचा पाऊस, पुराने कापूस पिकाला फटका: भाव पडण्याची भीती

यवतमाळ जिल्ह्यात यंदा पाऊस मोठ्या प्रमाणात पडला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात यंदा पाऊस मोठ्या प्रमाणात पडला आहे. मात्र, तीन दिवसांपासून बरसणाऱ्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच झोप उडविली आहे. मध्यंतरी कडक उन्हाने फुटलेली कापसाची बोंडे पावसात भिजल्याने कपाशीची विक्री करतांना शेतकऱ्यांना भाव पाडून दिला जाण्याचा धोका आहे.

हे देखील पहा-

जिल्ह्यातील ७० टक्के शेतकऱ्यांची संपूर्ण मदार कपाशीच्या पिकावर आहे. सोयाबीन पिकाला सप्टेंबर मधील पावासाने झोडपून काढले होते. त्यात तगलेल्या कापसावर शेतकऱ्यांच्या आशा आहेत. मात्र, दसऱ्याच्या सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली आहे. एकीकडे कपाशी वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्याने फुटलेला कापूस घरात कसा आणवा याची चिंता असतानाच पावसाने हा लाखमोलाचा कापूस भिजविला आहे.

आता दोन दिवस उघाड पडल्याशिवाय कापूस वेचता येणार नाही. शिवाय कपाशी वेचून विक्रीकरिता नेल्यावर आर्द्रतेच्या बहाण्यावरून व्यापारी भाव पाडण्याची भीती वर्तवली जात आहे. यामुळे भाव पडण्याची भीती वाटत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एका पिंपळाच्या झाडाच्या पुनर्वसनाच्या प्रेरणेतून सांगलीत घडली हरित चळवळ: आमदार सुहास बाबर

Nashik Firing: हिरावाडीतील ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार, परिसरात भीतीचं वातावरण

Kalyan Crime: गार्डनमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीवर जीवघेणा हल्ला, ४ ते ५ जणांनी मारहाण करत डोक्यात दारूच्या बाटल्या फोडल्या

Maharashtra News Live Update: नाशिकच्या हिरावाडी परिसरात ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार

Supreme Court: शेअरिंग कार, २ दिवस व्हर्च्युअल हेरिंग; इंधन बचतीच्या आवाहानानंतर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT