सततचा पाऊस, पुराने कापूस पिकाला फटका: भाव पडण्याची भीती Saam Tv
ऍग्रो वन

सततचा पाऊस, पुराने कापूस पिकाला फटका: भाव पडण्याची भीती

यवतमाळ जिल्ह्यात यंदा पाऊस मोठ्या प्रमाणात पडला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात यंदा पाऊस मोठ्या प्रमाणात पडला आहे. मात्र, तीन दिवसांपासून बरसणाऱ्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच झोप उडविली आहे. मध्यंतरी कडक उन्हाने फुटलेली कापसाची बोंडे पावसात भिजल्याने कपाशीची विक्री करतांना शेतकऱ्यांना भाव पाडून दिला जाण्याचा धोका आहे.

हे देखील पहा-

जिल्ह्यातील ७० टक्के शेतकऱ्यांची संपूर्ण मदार कपाशीच्या पिकावर आहे. सोयाबीन पिकाला सप्टेंबर मधील पावासाने झोडपून काढले होते. त्यात तगलेल्या कापसावर शेतकऱ्यांच्या आशा आहेत. मात्र, दसऱ्याच्या सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली आहे. एकीकडे कपाशी वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्याने फुटलेला कापूस घरात कसा आणवा याची चिंता असतानाच पावसाने हा लाखमोलाचा कापूस भिजविला आहे.

आता दोन दिवस उघाड पडल्याशिवाय कापूस वेचता येणार नाही. शिवाय कपाशी वेचून विक्रीकरिता नेल्यावर आर्द्रतेच्या बहाण्यावरून व्यापारी भाव पाडण्याची भीती वर्तवली जात आहे. यामुळे भाव पडण्याची भीती वाटत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT