शाॅटसर्किटमुळे सोयाबीनच्या गंजीला आग; 300 क्विंटल सोयाबीन जळून खाक Saam Tv
ऍग्रो वन

शाॅटसर्किटमुळे सोयाबीनच्या गंजीला आग; 300 क्विंटल सोयाबीन जळून खाक

वीज वितरण कंपणीच्या विघुत वाहिनीमध्ये शाॅटसर्किट झाल्याने शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ : यवतमाळ च्या घाटंजी तालुक्यामधील मुरली या गावात आत्मराम चव्हाण यांच्या शेतातून गेलेल्या वीज वितरण कंपणीच्या विघुत वाहिनीमध्ये शाॅटसर्किट झाल्याने शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग लागून ३०० क्विंटल सोयाबीन जाऊन खाक झाल्याची घटना रात्रीच्या दरम्यान घडली आहे.

हे देखील पहा-

सदर शेतकऱ्याने २५ एकरात ३० बॅग सोयाबीनची लागवड केली होती. ३०० क्विंटल सोयाबीन काढून गंजी मारून ठेवली असताना शेतातून विद्युत प्रवाह करणाऱ्या तारेच्या वाहिनीमध्ये स्पार्कींग झाल्याने सोयाबीनच्या गंजीला आग लागून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे महावितरणने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panchami Tithi: शरद ऋतु, पंचमी तिथि आणि चंद्र मिथुन राशीत; या राशींना मिळणार प्रोत्साहन व नवा प्रवास

Maharashtra Live News Update : राज्याचा पारा घसरला, पुण्यासह मुंबई गुलाबी थंडीने गारठले

Rashmika Mandanna: 'विजयसोबत लग्न करणार...'; अखेर रश्मिकाने कबूल केलंच, तो व्हिडिओ व्हायरल अन् चर्चांना उधाण

Maharashtra politics : राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही, शिंदेंच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Shocking : महाराष्ट्र हादरला! मुलाने केली वडिलांची हत्या, धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT