Shahapur News Saam tv
ऍग्रो वन

Shahapur News : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; आचारसंहितेमुळे भरपाई कोण देणार?, दिवाळीच्या तोंडावर शेतकरी चिंतेत

Shahapur News : मागील आठवडाभरापासून राज्यात परतीचा पाऊस होत आहे. यामुळे प्रचंड फटका बळीराजाला बसत आहे.

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 

शहापूर : राज्यात सध्या सतत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. दररोज वादळीवाऱ्यासह येणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. शेतातून मुठभर धान्य घरात येणार नसल्याची अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. कुषी विभागा मार्फत पंचनामे करून भरपाई मिळावी असी मागणी शेतकरी करत आहे.

मागील आठवडाभरापासून राज्यात परतीचा (Rain) पाऊस होत आहे. यामुळे प्रचंड फटका बळीराजाला बसत आहे. ठाणे (Thane) जिल्ह्यातील ग्रामीण भागात दररोज दुपारनंतर परतीचा पाऊस हजेरी लावत आहे. हा परतीचा पाऊस साधासुधा पडत नसून वादळीवाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पडत असल्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या भात, नागली, वरी या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचून असल्याने पीक पूर्णतः सडून गेले आहे. 

ऐन दिवाळीच्या तोंडावर हे नुकसान होत असून दिवाळीत घरात येणारे धान्य पावसामुळे शेतात कुजत आहे. यामुळे मुठभर देखील धान्य घरात येणार नसल्याची खात्री आता शेतकऱ्यांना झाली आहे. वर्षभराची मेहनत वाया गेली. त्यात विधानसभेच्या निवडणूक यामुळे शेतकऱ्यांनी भरपाई कोणाकडे मागायची हा प्रश्न उपस्थित राहीला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT