Latur  दीपक क्षीरसागर
ऍग्रो वन

पिक विम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्याचे कृषी विभाग व तहसील कार्यालयाला निवेदन

दीपक क्षीरसागर

लातूर - जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील केळगाव येथील शेतकऱ्यांना अध्यापही पिक विमा नुकसान भरपाई मिळाली नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. यामुळे आज केळगाव येथील शेतकऱ्यानी (Farmer) निवेदन दिले आले. निलंगा तालुक्यातील केळगाव येथे 2021 या खरीप हंगामातील पीक विमा (Crop Insurance) अनेक शेतकऱ्यांनी भरला होता. मात्र 10 ते 20 टक्के शेतकऱ्यांची नावे या पिक विमा व नुकसान भरपाईच्या यादीमध्ये आली आहेत व यांचे वाटप तेवढ्याच मर्यादित शेतकऱ्यांना झाले आहे.

हे देखील पहा -

मात्र उर्वरित 70 ते 80 टक्के शेतकऱ्यांची यादी मध्ये नाव आलेले नसून परिणामी पिक विमा मिळाला झाला कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यासमोर पिक विमा कंपनीमुळे नवीन संकट उभे केले आहे. खरिपाचे सोयाबीन हे अतिवृष्टी व पुराच्या पाण्यात वाहून गेले यामुळे शेतकर्‍यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. केळगाव येथील शेतकरी बांधवांनी निलंगा तहसील कार्यालय व कृषी कार्यालय निलंगा येथे निवेदन करून पीक विम्याची व नुकसानभरपाईचे लवकरात लवकर मंजुरी मिळावी व वाटप करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी शेतकरी मदार मागणे, तुराब मुजावर, शिवाजी कांबळे, अफसर पटेल, इनुस पठाण विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन एकनाथ काळे, सर्व शेतकरी बांधव उपस्थित राहून पीक विम्याची मागणी केली आहे जर पिक विमा लवकर मंजूर नाही झाला तर कृषी कार्यालय आणि तहसील कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT