उस्मानाबाद जिल्ह्यात संततधार; खरीप पिकांना जीवनदान कैलास चौधरी
ऍग्रो वन

उस्मानाबाद जिल्ह्यात संततधार; खरीप पिकांना जीवनदान

मागील दोन दिवसांपासून उस्मानाबाद जिल्ह्यात सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर ढगाळ वातावरण तर काही प्रमाणत भिज पाऊस पडल्याने गारवा निर्माण झाला आहे.

Sanika

कैलास चौधरी

उस्मानाबाद : मागील दोन दिवसांपासून उस्मानाबाद Osmanabad जिल्ह्यात सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर ढगाळ वातावरण तर काही प्रमाणत भिज पाऊस पडल्याने गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे काही प्रमाणत पाणी साठा तयार झाला असून नदी, नाले, ओढे प्रवाहित झाले आहेत. काही मंडळामध्ये पावसाचे प्रमाण अधिक असल्याने तेथील खरीप हंगामातील पिकांना अती पावसाचा फटका बसला आहे.

या वर्षी पावसाने सुरुवातीच्या टप्प्यात दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येते की काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने आजपर्यंत 55.7 टक्के पावसाची नोंद झाली आहे. दीड महिन्यात 25.28 दलघमी पाणीसाठा झाला आहे. काही मंडळामध्ये पावसाचे प्रमाण अधिक असल्याने तेथील खरीप हंगामातील पिकांना अती पावसाचा फटका बसला आहे.

तर जिल्ह्यातील काही मंडळात आवश्यकतेनुसार पाऊस Rain झाल्याने या भागातील खरीप पिके अगदी जोमाने वाढत वाढत असल्याचे पाहायला मिळते आहे. तुळजापूर आणि उमरगा-लोहारा तालुक्यातील लहान तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षापासून समाधानकारक पाऊस पडत असून, गेल्यावर्षी जून ते जुलै महिन्याच्या दरम्यान 2073 मिमी पाऊस पडला होता.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dasara Melava: बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार? दसरा मेळाव्यात राज-उद्धव एकत्र येणार?

TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट

Nilesh Ghaywal : खाकीचा खुळखुळा, गँगस्टर पळाला; निलेश घायवळला पळवणारे पुणे पोलिसांमध्ये कोण? VIDEO

Black Pepper : दररोज काळीमिरी खाल्ल्याने आरोग्याला होतात 'हे' भन्नाट फायदे

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला खोटा? अहवालात नेमकं काय?

SCROLL FOR NEXT