मावळ - हवामान खात्याकडून मिळालेल्या मान्सून आगमनाच्या वार्तानंतर मावळातील (Maval) खरीप हंगामापूर्वीच्या मशागतीच्या कामांना शेतकऱ्यांकडून सुरुवात झाली आहे. तर काही कामे अंतिम टप्प्यात आहे. भातशेतीच्या नव्या हंगामाच्या शेतीच्या कामांना सुरुवात करून शेतकरी पुन्हा त्याच उमेदीने शेतीसाठी सज्ज झाला आहे.
हे देखील पाहा -
मावळ तालुक्यात भात हे मुख्य पीक आहे. मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने भातशेतीला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते. मात्र हे नुकसान भरून काढण्यासाठी यंदा पुन्हा एकदा बळीराजाने कंबर कसली आहे. यासाठी शेतीपूर्व मशागतीच्या कामांना विविध भागांत सुरुवात करण्यात आली आहे.
यासाठी शेतामध्ये परंपरागत 'राब' केला जात आहे. म्हणजेच शेतातील पालापाचोळा, शेण, काठ्याकुड्या त्यावर पेंडा, गवत टाकून पेटवला जात आहे. असे केल्यामुळे शेतातील अनावश्यक तण नष्ट होऊन जमीन भाजली जाते आणि यामुळे जमीन अधिक कसदार होण्यास मदत होते. भाताची पेरणी केल्यावर रोपात तण उगवून वाढू नये, हा त्याचा मुख्य हेतू असतो. आंतरमशागत अशी अनेक कामे वेळच्या वेळी होणे व योग्य पध्दतीने होणे अत्यावश्यक आहे.त्यामुळे शेतकरी आता मशागतीची कामे करण्यात व्यस्त आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.