शेतकऱ्यांना बियाणे, खते उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे - पालकमंत्री पाडवी  SaamTVNews
ऍग्रो वन

शेतकऱ्यांना बियाणे, खते उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे - पालकमंत्री पाडवी

नंदुरबार जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना चांगल्या दर्जांचे बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, आदी कृषी निविष्ठा उपलब्ध करुन देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्हाचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात आज खरीप हंगाम पुर्व आढावा बैठक संपन्न झाली.

हे देखील पाहा :

खरीप हंगाम 2022-2023 साठी शेतकऱ्यांना उपलब्ध करुन येणारे बियाणे चांगल्या दर्जाची असावे. राष्ट्रीय कृत बॅकांनी कृषी कर्ज वाटपाला प्राधान्य द्यावे. 127 हेक्टर क्षेत्रात एरंडी लागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. रासायनिक खते विक्रेत्यांनी पीओएस मशिनद्वारेच खताची विक्री करावी. खताची विक्री शासकीय दरानेच करावी. जादा दराने विक्री बियाणे, खते तसेच कृषि निविष्ठा विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी. युरीयाचा वापर कमी होण्यासाठी नॅनो युरियाचा वापर वाढविण्यावर भर देण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी.

त्यासाठी प्रत्येक दुकानात नॅनो युरिया वापरा बाबतचे जनजागृतीपर फलक लावण्यात यावेत. ठिबक सिंचन क्षेत्र वाढवावे, प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा व गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा यासाठी जनजागृती करावी. वीज जोडणी पूर्ण करावी, शेतकऱ्यांच्या मागणी नुसार खताच्या बियाणे विक्रेत्यांनी उपलब्ध करुन द्यावे. सेंद्रीय खताचा कंपोस्ट, गांडुळ खत, जिवाणु खते वापरण्यासाठी जनजागृती करावी अशा सूचना पालकमंत्री के सी पाडवी यांच्या द्वारे करण्यात आल्या.

नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगाम 2022 साठी भात, मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन व इतर बियाण्यांसाठी 23 हजार 377 क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. तर बी.टी कापूस बियाण्यासाठी 6 लाख 25 हजार पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी खरीप हंगामासाठी 3 हजार 30 मे. टन युरिया व 590 मे. टन डि. ए. पी. संरक्षितसाठा मंजूर केला आहे. खरीप हंगामासाठी 1 लाख 34 हजार 800 मे. टन रासायनिक खताची मागणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक निलेश भागेश्वर यांनी दिली.

या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, आमदार डॉ. विजयकुमार गावित, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रधुनाथ गांवडे, कृषी सभापती गणेश पराडके, सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, डॉ. मैनक घोष, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर, जिल्हा कृषी अधिकारी एल. डी. भोये, आदी उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weigh Gain Tips: वजन वाढवण्यासाठी आहारात कोणते बदल करावेत? वाचा माहिती

Maharashtra Live News Update: इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत - फडणवीस

दोन व्यक्तींनी दिली १६० जागांची गॅरंटी, शरद पवारांचा खळबळजनक खुलासा, मुख्यमंत्र्यांचा उलट सवाल

Home Vastu Tips: आर्थिक समृद्धीसाठी घरात कोणते वास्तु बदल करावेत?

Maharashtra Vande Bharat Express : महाराष्ट्रातून धावणार देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत, १० ठिकाणी थांबे अन् ११ तासांचा प्रवास, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT